शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

पंचनाम्यास मिळाला मुहूर्त

By admin | Updated: June 19, 2015 00:19 IST

कापसाचे नुकसान : शास्त्रज्ञांचे पथक आटपाडीत दाखल

अविनाश बाड-आटपाडी -अखेर राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांना आटपाडी तालुक्यातील नुकसान झालेल्या कापसाच्या शेतीची पाहणी करण्यासाठी मुहूर्त सापडला. गुरुवारी या विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पातील डॉ. अधिर आहेर आणि डॉ. नीलेश पवार या शास्त्रज्ञांनी तालुक्यातील कापसाच्या शेतीची पाहणी केली. यंदा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना २० कोटींचा फटका बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.आटपाडी तालुक्यातील ५०० हेक्टर शेतातील उन्हाळी हंगामातील कापसाची लागवड पूर्णपणे वाया गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कापसाचे बियाणे भेसळयुक्त असल्याने उगवण नीट झाली नाही. उगवणीनंतर ३ महिन्यांत पाच ते साडेपाच फूट उंच वाढण्याऐवजी केवळ फूट-दीड फूटच वाढ झाली. झाडाला २०० ते २५० फुलांऐवजी एखादे फूल लागल्याची तक्रार केली होती. यानंतर कृषी विभागाकडे यातील तज्ज्ञ व्यक्ती नसल्याने त्यांनी राहुरीच्या कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांना पाठविण्यात येईल, असे सांगितले. मात्र तक्रारीनंतर पाच, सहा दिवस कोणीच न आल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर आज (गुरुवारी) राहुरी विद्यापीठाच्या डॉ. आहेर आणि डॉ. पवार यांनी नेलकरंजी, औटेवाडी, धावडवाडी, मानेवाडी, मेटकरीवाडी, पिंपरी, खरसुंडी, निंबवडे येथील वाया गेलेल्या कापसाच्या शेतीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय कृषी अधिकारी जे. जी. कवडे, तालुका कृषी अधिकारी अशोक होलमुखे, कृषी अधिकारी चंद्रकांत माळी उपस्थित होते. या पाहणीबाबत या नुकसानीस कारणीभूत असणारा स्पष्ट अहवाल दोन दिवसात देणार आहे. शास्त्रज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी जे. जी. कवडे यांनी दिली. वादावादी...कृषी शास्त्रज्ञांसाह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक पाहणीसाठी गावोगावी गेल्यानंतर तिथे बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार उपस्थित होते. त्यांची आणि शेतकऱ्यांची अनेक ठिकाणी जोरदार वादावादी झाली. आमचा एकरी १५ हजार रुपये खर्च झाला असून, बियाणे उत्पादक कंपन्यांकडून या खर्चासह नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. या भागातील शेतकऱ्यांनी कृषीधन कंपनीचे सुपर फायबर ४0७ आणि ग्रीन गोल्ड कंपनीचे कविता या दोनच जातीची लागवड केली आहे. पाहणी केली असता सर्वत्र दोष आढळले. बियाणांमध्ये थोडीफार गफलत आहे, पण ठामपणे आताच सांगता येणार नाही. शेतकऱ्यांच्याही चुका आहेत. त्यांनी हलक्या जमिनीत कापसाची लागवड केली आहे. विद्यापीठाच्यावतीने या भागात ‘नॉन-बी टी’ वाणाची लागवड करावी, अशी शिफारस केली जाते. अन्यथा बी. टी. वाणाची लागवड शेतकऱ्यांनी २५ मे नंतर करावी. - डॉ. अधिर आहेर, शास्त्रज्ञ, राहुरीया भागातील कापसाच्या सर्वेक्षणात शेतकऱ्यांनी मुुख्यत: बी. टी. वाणाच्या दोनच आंतरजातीय वाणाची लागवड केली आहे. अमेरिका आणि इजिप्त येथील वाणांच्या संकरातून उत्पादित केलेले हे वाण आहे. उन्हाळ्यात तापमान जास्त राहिल्याने कापसाच्या झाडामध्ये अनेक बदल होतात. हलक्या जमिनीत लागवड केलेल्या ४० ते ५० टक्के कापसाच्या पिकात आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसून आली आहेत. मात्र एकाच निकषावर निष्कर्ष काढता येणार नाही.- डॉ. नीलेश पवार, कृषी शास्त्रज्ञ, राहुरी