शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
4
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
5
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
6
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
7
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
8
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
9
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
10
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
11
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
12
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
13
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
14
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
15
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
16
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
17
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
18
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
19
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
20
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

पलूस तालुक्यात केवळ ४९ टक्के पाऊस

By admin | Updated: August 20, 2015 22:47 IST

शेतकरी धास्तावला : पशुधन जगविण्याचे आव्हान; २५ हजार हेक्टरचे नुकसान

आर. एन. बुरांडे -पलूससधनतेमुळे नेहमी निश्चिंत असणारा पलूस तालुक्यातील शेतकरी यावर्षी मात्र आजअखेर केवळ ४९.५ टक्के पडलेल्या पावसाने धास्तावला आहे. सिंचनाखालील २४६९४.०० हेक्टर क्षेत्रातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, पशुधन जगविण्याचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. एकूण ३५ गावांचा पलूस तालुका सांगली जिल्ह्यातील एक सधन आणि लहान तालुका म्हणून ओळखला जातो. कृष्णा आणि वेरळा नद्यांनी तालुका वेढलेला असूनही, यंदा पावसाने ओढ दिल्याने कृष्णेचे पाणी कमी झाले आहे. येरळा नदी तर कोरडीच पडली आहे. तालुक्यात ३७ उपसा जलसिंचन योजनांचे जाळे असूनही पाण्याअभावी त्या बंद ठेवाव्या लागत आहेत. पर्यायाने भूजल पातळी खालावली आहे. परिसरातील विहिरी, तलाव, कूपनलिका, ओढे, नाले कोरडे ठणठणीत आहेत. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने उर्वरित पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. नेहमी हिरवागार असणारा पलूस तालुका हळूहळू पिवळा पडू लागला आहे. अपुऱ्या पावसाने खरीप हंगाम आता जवळपास काळवंडलेला आहे. यामुळे आताच्या या भीषण परिस्थितीला कसे तोंड द्यायचे, याची चिंता शेतकरी आणि सर्वसामान्यांना लागली आहे.तालुक्याचे एकूण क्षेत्र २७ हजार ४४५ हेक्टर आहे. शेतीतील बागायती क्षेत्र ८ हजार ११३ हेक्टर आहे. खरिपाचे क्षेत्र २३ हजार १६५ हेक्टर आहे. रब्बीचे क्षेत्र ३ हजार १८६ हेक्टर आहे, तर क्षारपड क्षेत्र एक हजार ६८२ हेक्टर आहे. बागायती क्षेत्रामध्ये भिलवडी, अंकलखोप, आमणापूर, नागराळे, बुर्ली, पलूस, पुणदी, घोगाव, धनगाव, दह्यारी, तुपारी, ब्रह्मनाळ, वसगडे आदी गावांचा समावेश आहे. या गावातील क्षेत्र ऊस आणि द्राक्षशेतीखाली येते. सोयाबीनचे क्षेत्र सुद्धा मोठे आहे. येथील पशुधन सुद्धा मोठे आहे. या पशुधनाला ओला हिरवा चारा खाण्याची सवय आहे. परंतु क्षेत्रात आता उभे पीक नाही आणि गवतही नाही. त्यामुळे जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. पावसाने ओढ दिल्यास जनावरांना खायला काय द्यायचे? हा प्रश्न आतापासूनच शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. शिवाय हंगाम वायाच जाणार असल्याने विकत चारा घेऊन जनावरांना सांभाळणेही जिकिरीचे होणार आहे.कृष्णाकाठच्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर नाही. परंतु पावसाने ओढ दिल्यास मोराळे, आंधळी परिसरातील गावात यापुढील काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.पावसाने ओढ दिल्याने सध्या बाजारपेठेत मंदीचे सावट आहे. परिसरातील किराणा, कृषी सेवा केंद्रे तसेच कापड दुकानदार आणि बॅँकिंग व्यवसायावर परिणाम झाल्याचे चित्र आहे.कृष्णा कालवा बारमाही कराजिल्ह्यातील सर्वात सधन तालुका म्हणून पलूस तालुक्याची ओळख होती. पण पावसाने ओढ दिल्याने यंदा येथील सधन शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालन केले आहे. परिसरात दूध संस्थाही मोठ्या आहेत. पण हंगाम वाया गेल्याने यापुढे वर्षभर जनावरे सांभाळायची कशी? हे सर्वात मोठे आव्हान शेकऱ्यांसमोर आहे. तालुक्यातून कृष्णा-कालवा जातो. हा कालवा बारमाही व्हावा, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. हा कालवा बारमाही झाला तर दुधोंडी, बुर्ली, आमणापूर, पलूस यासह अनेक लहान गावांना फायदा होणार आहे. पशूधन वाचविणेही शक्य होणार आहे. तालुक्यातून वाहणारी येरळा नदी कोरडी आहे. आरफळ योजनेचे पाणी वेळोवेळी येरळेत सोडले तर, मोराळे, आंधळी, बांबवडे हा भाग सुपीक होणार आहे. या साऱ्या बाबी व शक्यता लक्षात घेऊन पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.