शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

जिल्ह्यात निसर्ग साहित्य संमेलनाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST

सांगली : निसर्गप्रेमी, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथमच निमंत्रितांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती निसर्गरंग फाऊंडेशनचे संस्थापक ...

सांगली : निसर्गप्रेमी, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथमच निमंत्रितांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती निसर्गरंग फाऊंडेशनचे संस्थापक कुलदीप देवकुळे यांनी दिली आहे.

देवकुळे यांनी सांगितले की, ‘निसर्गराया भेटूया, चला विठ्ठल पेरूया’, ही संकल्पना घेऊन गेली पाच वर्षे सांगलीकर सांस्कृतिकप्रेमींची सायकलवारी आषाढीनिम्मित पंढरपुरी जात असते. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९ जुलै रोजी जिल्ह्यातच पर्यावरण जनजागृती सायकलवारी व २० जुलै रोजी निसर्गरंग साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संपूर्ण संमेलनाचे फेसबुकवरून थेट प्रसारण केले जाईल. तासगाव तालुक्यातील पेड येथे हे संमेलन होणार असून, यावेळी उद्घाटक, परिसंवाद, कवी संमेलन या तिन्ही कार्यक्रमांच्या सत्रात अध्यक्ष म्हणून महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून काष्ठशिल्पकार, निसर्गचित्रकार, साहित्यिक अशोक जाधव, तर स्वागताध्यक्ष म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे हे उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनाचे उद्घाटन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे, तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे विशेष निमंत्रित म्हणून संबोधित करणार आहेत.

संमेलनस्थळाला सुंदरलाल बहुगुणा नगरी नाव देण्यात आले आहे. तसेच विचारपीठाला प्राचार्य पी. बी. पाटील यांचे देण्यात आले नाव असून, प्रवेशद्वाराला स्वा. सै. किसनराव आनंदराव पाटील प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे. सायकल रॅलीची सुरुवात १९ जुलैला विष्णुदास भावे नाट्यगृहातून सकाळी साडेसात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.