शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

विरोधकांनी दुष्काळाचे राजकारण बंद करावे

By admin | Updated: December 29, 2015 00:57 IST

शिवाजीराव नाईक : शिराळ्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात टीका

येळापूर : गेल्यावेळी तुम्ही दोघे आमदार असतानाही पेठ एमआयडीसी, चांदोली पर्यटन, कासेगाव पोलीस ठाणे, शिरसी वीजवितरणचा प्रश्न का सोडविला नाही? करुंगलीच्या माळावरील कारखान्याने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले, त्यांनी दुष्काळाचे राजकारण करू नये, असा टोला आमदार शिवाजीराव नाईक यांनी आमदार शिवाजीराव देशमुख व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांना लगावला. ते शिराळा येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. आमदार नाईक म्हणाले, गेल्यावेळी मला जनतेने पुन्हा संधी दिली नाही, तरीही मी जनतेच्या संपर्कात राहून कामे केली. पेठ एमआयडीसी रद्द करावी, अशी या भागातील सर्वांची मागणी होती. त्यांच्याही गटाचे यामध्ये लोक होतेच. मात्र तत्कालीन दोन्ही आमदारांनी दुर्लक्ष केले. गिरजवडे प्रकल्पाच्या मंडळाची मुदत संपल्याने निधी थांबला असून, त्या मंडळाला येत्या काही दिवसात मुदतवाढ मिळून कामे सुरू होतील. मात्र जनतेच्या डोळ्यात धूळ टाकण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादीने थांबवावे. नाईक म्हणाले, प्रश्नांची सोडवणूक न केल्यानेच जनतेने एकाला नाकारले, तर दुसऱ्या विरोधकांना जनतेने सलग तीन वेळा नाकारले असून, त्यांनी दुष्काळाचे राजकारण थांबवावे. शासनाचे कारखान्याला आलेले अनुदान लाटणाऱ्यांनी त्यावेळी शेतकऱ्यांचा विचार का केला नाही? आपले एकट्याचे काही खरे नाही, असे म्हणत आत दोघे एकत्र आले आहेत. त्यांना मी एकटा तोंड देण्यास खंबीर आहे. यावेळी जि. प. सदस्य रणधीर नाईक, सुखदेव पाटील, प्रल्हाद पाटील, कुंदाताई पाटील, गजानन पाटील, अर्जुन पाटील, एम. एस. कुंभार, बी. आर. पाटील, शहाजी उत्तम पाटील, डॉ. एस. व्ही. पाटील, मोहन पाटील, एन. डी. लोहार, विजय कांबळे, सुभद्रा आटुगडे, दगडू सावंत, कुमार कडोले, पांडुरंग गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)