शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

कोरोनाची लस घेतल्यानंतर केवळ वीसजणांना संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:27 IST

सांगली : लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झाल्याची उदाहरणे जिल्ह्यात अत्यल्प आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार अवघ्या वीसजणांना संसर्ग झाला आहे. ...

सांगली : लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झाल्याची उदाहरणे जिल्ह्यात अत्यल्प आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार अवघ्या वीसजणांना संसर्ग झाला आहे. अर्थात त्यांनी लसीचा एकच डोस घेतला होता.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. १४ फेब्रुवारीपासून दुसरा डोसही सुरू झाला आहे. लस घेतलेल्यांपैकी २० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला; पण त्यांचा दुसरा डोस अद्याप पूर्ण झालेला नव्हता. अर्थात लस घेतल्यानंतरही काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स यांचे लसीकरण झाले. त्यांपैकी काहीजण कोरोनाबाधित झाले; पण कोरोनातून बरेही झाले. त्यानंतर त्यांनी दुसरा डोसही घेतला. कोरोनाविरुद्धच्या युद्धात लढण्यासाठी ते आता पुन्हा आघाडीवर आहेत.

आजवर सव्वाचार लाख नागरिकांनी लस घेतली आहे, त्या तुलनेत वीसजणांना संसर्ग म्हणजे अत्यंत नगण्य मानला जातो. लस घेतल्यानंतर मृत्यूचे उदाहरण अजिबात नाही. लस घेतलेले कोरोनाबाधित वेगाने बरे झाल्याचा अनुभव आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यात कुचराई करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

कोट

लस घेतली म्हणजे मुक्त संचाराला परवानगी मिळाली असे नव्हे. लस घेतल्यानंतरही पुरेपूर काळजी घेतलीच पाहिजे. लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असा वैद्यकीय अभ्यास आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतर बेफिकिरीही न बाळगता मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग याची दक्षता घेतलीच पाहिजे. लस पूर्णत: सुरक्षित असल्याने ती घेण्यात कुचराई करू नये.

- डॉ. विवेक पाटील, लसीकरण अधिकारी