शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

इस्लामपूरच्या नगराध्यक्षांकडून केवळ स्टंटबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST

इस्लामपूर : येथे नगराध्यक्षांकडून सभागृहाचे पावित्र्य जपले जात नाही. बेजबाबदारपणे बोलून स्टंटबाजी करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी ...

इस्लामपूर : येथे नगराध्यक्षांकडून सभागृहाचे पावित्र्य जपले जात नाही. बेजबाबदारपणे बोलून स्टंटबाजी करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी निशिकांत पाटील यांच्यावर केली. गेल्या सव्वावर्षांच्या काळात पालकमंत्री जयंत पाटील यांनी १३ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला गती दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह घेतलेल्या पत्रकार बैठकीत पाटील बोलत होते. पत्रकार परिषदेला सुरुवात होताच गटनेते संजय कोरे यांनी रुग्णालयात जाण्याचे कारण सांगत काढता पाय घेतला.

पाटील म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षांच्या काळात मागील सरकारकडून काही निधी न मिळाल्याने शहराच्या विकासाची गती मंदावली होती. मात्र जयंत पाटील यांनी आता शहराच्या विकासात लक्ष घातले आहे. वाॅर्डनिहाय बैठकातून नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून आलेल्या सूचना विचारात घेत त्यांनी रस्ते, गटार आणि पाणी व्यवस्थेसाठी १३ कोटी ४५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून होणाऱ्या १६ कामांसाठी आता पालिकेच्या ना हरकत पत्राची अथवा ठरावाची गरज भासणार नाही.

पाटील म्हणाले, जिल्हा विकास निधीतून वेगवेगळ्या कामांचे सुमारे १५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव होते. मात्र नगराध्यक्षांनी दुर्लक्ष केल्याने हे विषय मंजूर झाले नाहीत. डिसेंबरपासून आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. शेवटी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यानंतर ऑनलाईन बैठक झाली. त्यातही हे विषय प्रलंबित राहिले. हे विषय मंजूर झाले असते, तर आणखी १५ कोटींचा निधी मिळाला असता.

चिमण डांगे म्हणाले, आता निधी मिळायला सुरुवात झाली आहे. पुढच्या काळात राहिलेली विकासकामे पूर्ण करणार आहोत.

विश्वास डांगे, खंडेराव जाधव, प्रा. शामराव पाटील, बी. ए. पाटील, प्रा. अरुणादेवी पाटील, भगवान पाटील, सुभाष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, पीरअली पुणेकर, शंकर चव्हाण उपस्थित होते.

चौकट

अण्णा डांगे यांची फिरकी

पत्रकार बैठक डांगे यांच्या निवासस्थानी झाली. त्यावेळी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. पत्रकार बैठक संपल्यावर माजी मंत्री अण्णासाहेब डांगे उपस्थित झाले. डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते वेळाने आले. त्यांनी सगळ्यांकडे बघत, ‘काय निवडणूक जवळ आली का?’ असा मिश्किल प्रश्न केल्यावर सगळे हास्यकल्लोळात बुडाले.