शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जिल्ह्यात साडेअकरा हजार रिक्षाचालकांना मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:25 IST

सांगली : राज्य शासनाने पंधरा दिवसांसाठी लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे दुर्बल घटकांना रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यावर दिलासा ...

सांगली : राज्य शासनाने पंधरा दिवसांसाठी लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे दुर्बल घटकांना रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यावर दिलासा देताना रिक्षाचालकांना १५०० रुपये मदतीची घोषणा करण्यात आली असून, जिल्ह्यातील ११ हजार ५०० नोंदणीकृत रिक्षाचालकांना याचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, या निर्णयाचे बहुतांश रिक्षाचालकांनी स्वागत केले असून, काहीच मदत नव्हती, यापेक्षा मदत मिळतेय, हे समाधानकारक असले तरी अजूनही मदतीची मागणी होत आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे १५ दिवसांसाठी संचारबंदी लागू करतानाच यावेळी शासनाने दुर्बल घटकांना काही प्रमाणात दिलासाही दिला आहे. त्यात पहिल्यांदाच रिक्षाचालकांना मदत जाहीर करण्यात आली आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर हळूहळू जनजीवन सुरळीत होत असल्याने रिक्षाचालकांनाही मदत होत होती. मात्र, महिनाभरापासून पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढतच चालल्याने रिक्षाचालक अडचणीत सापडले आहेत. आता पुढील पंधरा दिवस असलेल्या संचारबंदी, कडक निर्बंधावेळीही रिक्षाचालकांचे हालच होणार असल्याने शासनाने १५०० रुपयांची मदत जाहीर केली आहे. वर्षभरापासून रिक्षाचालकांच्या संघटना मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करत होत्या. मात्र, त्यात यश आले नव्हते. अखेर आता दुर्बल घटक म्हणून दखल घेतल्याने भविष्यातही मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नोंदणी नसलेल्या रिक्षाचालकांनाही मदत मिळावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

कोट

शासनाने मदत केली असलीतरी ही मदत खूपच तुटपुंजी स्वरूपाची आहे. तसेच सर्व रिक्षाचालकांना मोफत धान्यही मिळावे तसेच किमान पाच हजार रुपये मिळावेत, अशी अपेक्षा आहे. तरच आमची रोजीरोटी चालणार आहे.

महेश वाघमोडे, रिक्षाचालक

कोट

शासनाचा व्यवसाय कर असो, विमा असो अथवा इतर सगळे कर रिक्षाचालक भरतात. त्यामुळे त्यांना त्यामानाने मदत मिळणे अपेक्षित आहे. ठाकरे सरकारने फुल ना फुलाची पाकळी म्हणून केलेली मदत चांगली असलीतरी अजून साहाय्य करावे.

अजय मासाळ

कोट

गेल्या वर्षभरापासून सर्व रिक्षाचालक आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांना झालेली ही मदतही फायद्याची असलीतरी एकाचवेळी नको किमान दोन हप्प्यात का होईना जादा मदत मिळावी हीच मागणी असणार आहे.

गणेश सुरगाडे