शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

'शिराळ्यात जुने राजकारण नव्या वळणावर

By admin | Updated: December 28, 2015 00:29 IST

शिवाजीरावांचे ‘एकला चलो रे’ : विधानसभेपासून दुरावलेल्या दोघा ‘भाऊं’चे ऐक्य

येळापूर : दुष्काळ व पाण्याच्या विषयावरून शिराळा मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून, विधानसभेला वेगळी झालेली दोन भाऊंची युती पुन्हा जुळली असून, यापुढील सर्व निवडणुका एकत्र लढवू, असा संदेश देत मोर्चा काढला, तर आमदार शिवाजीराव नाईक यांनी ‘एकला चलोरे’च्या घोषणेसह कामाला सुरुवात केली आहे.दीड वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ. शिवाजीराव नाईक-भाजप, माजी आमदार मानसिंगराव नाईक- राष्ट्रवादी, तर सत्यजित देशमुख यांनी कॉँग्रेसच्या तिकिटावर स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. यामध्ये शिवाजीराव नाईक यांनी बाजी मारली. त्यानंतर दुरावलेले दोन भाऊ एकत्र येतील की नाही, असे वाटत असतानाच शिराळा बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत या दोघांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.त्यातच वाकुर्डे योजनेचे पाणी करमजाईत सोडण्यात यावे, गिरजवडे मध्यम प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा, वाकुर्डे योजनेचे वीज बिल, डाव्या कालव्याची कामे आणि तालुका दुष्काळी करावा आदी विषयांवर सर्व नेत्यांत आरोप-प्रत्यारोपाने संपूर्ण शिराळा मतदारसंघात वातावरण तापले. त्यातच कॉँगे्रस-राष्ट्रवादीने एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत दुष्काळाच्या मुख्य प्रश्नाला हात घातला आणि युती सरकारचे वाभाडे काढले. तालुका दुष्काळी जाहीर व्हायला अजून अवधी लागण्याची शक्यता आहे. विधानसभेला विभागलेल्या दोन भाऊंनी एकत्र येत आमदार नाईक यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तर आ. शिवाजीराव नाईक यांनी भाजपच्या माध्यमातून ‘एकला चलो रे’वर भर देत वाटचाल सुरू केली आहे. (वार्ताहर)विविधप्रकारे व्यथा तालुक्यात निम्म्यापेक्षा कमी पाऊस झालेला आहे आणि खरीप हंगामातील पीक उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्र मोर्चे काढून निवेदने दिली, तर आ. नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. चुकीचा पंचनामा केल्याच्या मुद्यावर जि. प. सदस्य रणधीर नाईक यांनी पदयात्रा काढून दुष्काळाच्या व्यथा मांडल्या.