शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

दुष्काळी फोरमसमोर अडथळे

By admin | Updated: July 17, 2014 23:38 IST

विधानसभा निवडणूक : भाजप-सेनेच्या भांडणाचा परिणाम

अविनाश कोळी - सांगलीभाजप-सेनेच्या भांडणामुळे भाजपवर प्रेम असलेल्या दुष्काळी फोरमच्या काही नेत्यांची संभ्रमावस्था वाढली आहे. भाजपवर प्रेम असले तरी, काहींना सेनेशी विवाह करावा लागणार आहे, तर काहींना भाजपशी लग्नाची संधी असूनही पक्षांतर्गत विरोधामुळे प्रवेशालाच सासुरवास भोगावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक मोठा गट सध्या महायुतीच्या प्रेमात पडला आहे. त्यांना पक्षप्रवेशाचे वेध लागले आहेत. एकूण आठ विधानसभा मतदार संघापैकी शिराळा, सांगली, तासगाव-कवठेमहांकाळ, जत, पलूस-कडेगाव या ठिकाणचे काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेते महायुतीत येण्यास इच्छुक आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ, जत आणि पलूस-कडेगाव या तीन मतदारसंघात सध्या दुष्काळी फोरमचे नेते प्रवेशाच्या उंबरठ्यावर आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू आहे. अजितराव घोरपडे, विलासराव जगताप आणि पृथ्वीराज देशमुख यांची पहिली पसंती भाजपला होती. तरीही शिवसेनेने पाच जागांवर दावा केल्यामुळे पक्षप्रवेश करू इच्छिणाऱ्या या नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. मोठ्या नेत्यांना विधानसभा लढवायची असेल तर त्यांनी शिवसेनेतर्फे लढावे, असे आवाहनही आता शिवसेनेचे नेते करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार केलेल्या या नेत्यांपैकी काहींनी प्रसंगी शिवसेनेतून लढण्याची मानसिकता तयार केली आहे. तरीही ज्या पक्षात ते जाऊ पहात आहेत, त्या पक्षातील निष्ठावंत गटाचा त्यांना विरोध होत आहे. लोकसभा निवडणुकीवेळीही हाच अनुभव संजय पाटील यांना आला. त्यातच कुंपणावरील या नेत्यांची पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे, कुठे जायचे, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्या तरी, महायुती व आघाडीचे जागावाटप झालेले नाही. त्यामुळे नेमकी राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने करायची, याचा निर्णय घेताना नेत्यांची संभ्रमावस्था वाढली आहे. शिराळ्यात शिवाजीराव नाईकांना स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवारी देण्यास उत्सुक आहे, तर नाईकांनी महायुतीत कोणत्याही पक्षाला ही जागा गेली, तर त्या पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. महायुतीचे जागावाटप होताना सांगली जिल्ह्यात त्यांच्या अन्य घटकपक्षांनाही जागा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे नेमक्या कोणाच्या जागा कमी होणार, याचेही कोडे सुटलेले नाही. भाजपला हक्काच्या तीन मतदार संघांसह आणखी दोन हवे आहेत. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विट्याचे माजी आमदार अनिल बाबर सध्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे या सर्व नेत्यांचे लक्ष आता जागावाटपाकडे लागले आहे.