शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

वाळवा तालुक्यातील रुग्णसंख्या लवकरच कमी होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोणीही घाबरून जाऊ नये. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्याने बाधित ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोणीही घाबरून जाऊ नये. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्याने बाधित रुग्ण निष्पन्न होत आहेत. या सर्वांवर वेळीच उपचार होत आहेत. लवकरच रुग्णांचे प्रमाण कमी होईल. सर्वांनी एकत्र येऊन कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केल्यास निश्चित यश मिळेल, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोशल मीडियावरून व्यक्त केला.

ते म्हणाले, गेल्या काही दिवसात वाळवा तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. म्हणून मागील काही दिवसांपासून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या आहेत. काल इस्लामपूर येथेही प्रत्यक्षात आढावा बैठक घेतली.

पाटील म्हणाले, तालुक्यातील विलगीकरण कक्ष वाढवण्यासह चाचण्या वाढण्याच्या सूचना मी दिल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी होताना दिसत आहे. आधी जवळपास ८०० चाचण्या होत होत्या. आता त्याची संख्या २००० पर्यंत गेली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आला आहे. मागील काही दिवसात साटपेवाडी, बोरगावमधील शिवाजीनगर या भागात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आढळल्यानंतर या भागात राहणाऱ्या सर्वच नागरिकांच्या चाचण्या घेतल्या आहेत. त्यामुळे पुढील संसर्गास आळा बसेल.

ते म्हणाले, कोरोनाचे निदान लवकर झाले तर रुग्णांवर लवकरच उपचार करता येतात. त्यामुळे जास्त चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाला गांभीर्याने घेतले पाहिजे .सर्वांनी सूचनांचे पालन केले तर ही परिस्थिती आटोक्यात येईल.

चौकट

नियम पाळा..!

जयंत पाटील म्हणाले, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वांना एकत्र प्रयत्न करायला हवा, मला विश्वास आहे की आपल्याला यश मिळेलच. सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे, अनावश्यक गर्दी टाळावी आणि शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे.