शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

लढाई नवीन नसल्याने कुणी आव्हान देण्याची गरज नाही

By admin | Updated: July 14, 2014 00:33 IST

आर. आर. पाटील : नाव न घेता केली घोरपडेंवर टीका

ढालगाव : कोण किती कर्तृत्ववान आहे, हे जनतेला निश्चितपणे माहिती आहे. त्यामुळे भविष्यात याचा लेखा-जोखा जनताच करेल. घोडेमैदान आता जवळ आहे. मला लढाई नवी नाही. त्यामुळे लढाईचे आव्हान देण्याची कोणी गरज नाही, असा प्रतिटोला गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विरोधकांना लगावला.ढालगाव, कदमवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे ते बोलत होते. ते म्हणाले, माझ्या राजकारणाची सुरुवात कुठल्या घराण्याचे नाव सांगून झाली नाही, तर स्वत: मैदानात उतरून लढत झालेली आहे. मैदानात उतरून लढण्याचा अनुभव आहे. त्यामुळे राजकारणातील लढाई माझ्यासाठी नवीन नाही.कार्यकर्त्यांना ज्यांनी कट्टरतेचे धडे शिकवले, त्यांनी आपण किती कट्टर आहोत, ते एकदा बघावे. एकदा अपक्ष, एकदा काँग्रेस, एकदा भाजप असा प्रवास करणाऱ्यांनी एक पाय भाजपत, तर दुसरा पाय शिवसेनेत असे धोरण ठेवले आहे, अशी टीका घोरपडे यांचे नाव न घेता केली.ते म्हणाले, मोदींची लाट ओसरली आहे. महागाई का वाढत आहे, याचे उत्तर कोणत्याही भाजप नेत्याकडे नाही. देशातील चार उद्योगपतींचे भले करण्याचे राजकारण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.मी कुठल्या बड्या माणसापुढे मान झुकवून नव्हे, तर गरिबांच्या पायाकडे बघून राजकारण केले. अजून सुरुवात केलेली नाही, तोपर्यंत कोणाला तोंडाची वाफ घालवायची असेल तर घालवू द्या. योग्यवेळी त्यांना पुन्हा उत्तर दिले जाईल. माजी सभापती चंद्रकांत हाक्के, जयसिंगराव शेंडगे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी बांधकाम सभापती दत्ताजीराव पाटील, जि. प. सदस्या राधाबाई हाक्के, भाऊसाहेब पाटील, उपसभापती अनिल शिंदे, जगन्नाथ कोळेकर, वैशाली पाटील, माजी सभापती जालिंदर देसाई, कल्पना पाटील, ताजुद्दीन तांबोळी, प्रशांत शेजाळ, भानुदास पाटील, कुमार पाटील, उपसरपंच अरविंद स्वामी, किसन घार्गे, कुमार पाटील उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. (वार्ताहर)