शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
4
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
5
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
7
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
8
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
9
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
10
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
11
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
12
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
13
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
14
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
15
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
16
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
17
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
18
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
19
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
20
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर

महापालिका, समितीला व्यापाऱ्यांचा ठेंगा

By admin | Updated: April 14, 2015 00:53 IST

प्रश्न एलबीटीचा : १५ एप्रिलचा अल्टिमेटम; अडीच कोटीचा भरणा; कारवाईचीही प्रशासकीय तयारी सुरू

सांगली : महापालिकेच्या एलबीटीच्या उत्पन्नात गेल्या पंधरा दिवसात फारसा फरक पडलेला नाही. व्यापाऱ्यांनी दोन वर्षातील थकित एलबीटीपोटी २५ टक्के रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. पण आतापर्यंत केवळ अडीच कोटी रुपयेच पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पदरी मोठी निराशाच पडली आहे. कृती समितीनेही कर भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या बैठका, सभा घेऊन आवाहन केले. पण त्यालाही ठेंगा दाखविला गेला आहे. दरम्यान, पालिकेने कर भरण्यासाठी १५ एप्रिलचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. राज्य शासनाने एक आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यात २०१३-१४ व २०१४-१५ या दोन वर्षात व्यापाऱ्यांकडे कोट्यवधी रुपयांचा एलबीटी थकित आहे. पालिकेच्या आकडेवारीवरून थकबाकी सुमारे १४० कोटीच्या घरात आहे. महापौर विवेक कांबळे यांनी थकित एलबीटी वसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतली. थेट बाजारपेठेत जाऊन प्रशासनाला बळ देण्याचा प्रयत्न केला. महापालिकेने कारवाईचा बडगा उगारताच राज्य शासनाचे नाव पुढे करीत कृती समितीने सांगलीत बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. दोन दिवस चाललेल्या या आंदोलनाची सांगता अखेर तडजोडीने झाली. पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे नेते मदन पाटील, खासदार संजय पाटील यांची शिष्टाई कामी आली. व्यापाऱ्यांनी थकित एलबीटीपैकी २५ टक्के रक्कम तात्काळ पालिकेच्या तिजोरीत जमा करावयाची व विवरणपत्र भरून त्यासोबत तीन हप्त्यात उर्वरित रक्कम भरण्याचे कृती समितीने मान्य केले. व्याज व दंड वसूल न करण्याबाबत पालिकेनेही सहकार्याची भूमिका घेतली. व्यापाऱ्यांच्या मनाप्रमाणे साऱ्या गोष्टी घडल्याने आता पालिकेची तिजोरी भरेल, अशा आनंदात पदाधिकारी, प्रशासन होते. पण त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेल्या पंधरा दिवसात केवळ अडीच कोटी रुपयांचा एलबीटी वसूल झाला. त्यात कृती समितीच्या सदस्यांनी २५ टक्के रक्कम भरून सुरूवात केली. पण त्यानंतर मात्र व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्याकडे पाठ फिरविली आहे. कृती समितीचे सदस्य समीर शहा व इतरांनी ठिकठिकाणी व्यापाऱ्यांच्या बैठका घेऊन २५ टक्के रक्कम भरण्याचे जाहीर आवाहन केले. तसेच बाजारपेठेत रिक्षा फिरवून ध्वनिक्षेपकावरून जाहीर आवाहनही केले. शिवाय पत्रके काढून विविध व्यापारी असोसिएशनलाही पाठविली आहेत. वैयक्तिक पातळीवर शहा यांनी बरेच प्रयत्न केले. पण त्यालाही आता व्यापाऱ्यांचा प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी) महापौरांचे सामूहिक प्रयत्न महापौर विवेक कांबळे यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हक्काच्या उत्पन्नापासून वंचित राहावे लागणार असल्याने सर्व महापालिकांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील ड वर्गातील सर्व महापालिकांचे महापौर व उपमहापौरांना त्यांनी पत्रही पाठविले आहे. दोन दिवसात अकोला, नांदेड, अमरावती या पालिकांच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांशी संपर्क साधून पुढील वाटचालीबाबत चर्चा केली. येत्या २९ मे रोजी महापौर परिषद होत आहे. या परिषदेतही पुन्हा चर्चा होऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. व्यापाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत कर भरण्याचा शब्द दिला होता, तो त्यांनी पाळावा, असे आवाहन कांबळे यांनी केले.