शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

‘निनाईदेवी’चे ३४ कोटींचे कर्ज बनले विनातारणी...

By admin | Updated: September 1, 2015 22:27 IST

नियमांचे दहन : जुने कर्ज बाकी असताना नवे कर्जवितरण--जिल्हा बँक गैरव्यवहार-३

सांगली : कोकरूड (ता. शिराळा) येथील निनाईदेवी सहकारी साखर कारखान्याला कर्जपुरवठा करण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने नियमांचे दहन केल्याचे दिसून येते. कार्यालयाची कर्ज मंजुरीची शिफारस नसताना तसेच पूर्वीची कर्जबाकी असतानाही या कारखान्याला नव्याने कर्जपुरवठा करण्यात आला. कारखान्याची आर्थिक स्थिती कमकुवत असतानाही संचालक मंडळाने स्वत:च्या जबाबदारीवर कर्ज मंजूर केले. कारखान्याची संपूर्ण मालमत्ता राज्य बॅँकेने तारण घेतल्याने आता या कर्जास कोणतेही तारण उरले नाही. बॅँकेच्या कार्यकारी समितीने ७ मे २००२ रोजी या कारखान्यास ८ कोटी ७० लाख रुपये मध्यम मुदत कर्ज स्वभांडवलातून मंजूर केले. याला कार्यालयाची शिफारस नाही. कर्ज अपुऱ्या तारणावर दिले असून, सध्या कोणतेही तारण उरले नाही. त्यामुळे या प्रकरणात २५ कोटी ३७ लाख ४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर बॅँकेच्या संचालक मंडळाने १९९९ ते २००१ या कालावधित वेळोवेळी एकूण ८ कोटी ५० लाखांचे कर्ज मंजूर केले. कारखान्याची आर्थिक परिस्थिती नसताना हा कर्जपुरवठा झाला. त्याचबरोबर ११ मे १९९९ रोजी कारखान्यास सहभाग योजनेतून प्रकल्प उभारणीसाठी ३ कोटी ८१ लाखांचे कर्ज दिले. त्यामुळे एकूण ३४ कोटी ७४ लाख ४० हजार रुपयांची थकबाकी असुरक्षित बनल्याचे स्पष्ट मत चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी अहवालात व्यक्त केले आहे. कर्जापोटी जिल्हा बँकेकडे कारखान्याने १४.६५ हेक्टर गायरान जमीन तारण दिली होती. याच कारखान्याला राज्य बँकेनेही सहभाग योजनेतून १४ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. याच कर्जाच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने हा कारखाना परस्पर दालमिया कंपनीला विकला. यामध्ये जिल्हा बँकेकडे तारण असलेल्या जमिनीचाही समावेश होता. जिल्हा बँकेने या प्रकरणी दालमिया कंपनी आणि राज्य सहकारी बँकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करतानाच जिल्हा बँकेने स्थानिक पोलिसांकडे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत फिर्याद दिली होती. त्यामुळे हे कर्जप्रकरण आणि तारण जमिनीचा वाद आता न्यायप्रविष्ट बनला आहे. त्यामुळे बॅँकेच्या थकित कर्जावरील व्याजाचा आकडा वाढत आहे. याशिवाय हे कर्ज आता आणखी असुरक्षित बनले आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी या सर्व कर्ज प्रकरणांमध्ये तत्कालीन संचालकांना जबाबदार धरले असून, थकित रकमेवरील व्याजालाही तेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)हे संचालक अडचणीततत्कालीन संचालक मंडळामध्ये प्रकाशबापू पाटील, विष्णुअण्णा पाटील, मदन पाटील, जगन्नाथ म्हस्के, उमाजीराव सनमडीकर यांचाही समावेश आहे. प्रकाशबापू व विष्णुअण्णा यांच्या वारसदारांची नावे त्यामुळे या आरोपपत्रात आली आहेत. विद्यमान संचालकांपैकी विलासराव शिंदे, मोहनराव कदम हे दोन संचालकही याप्रकरणी अडचणीत आले आहेत.