शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

साखर कारखाना संचालकांचं गाव म्हणून बहेची नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 23:06 IST

परिसरात चर्चा : दोन साखर कारखान्यात चौघांना संधी

निवास पवार- शिरटे  साखर कारखानदारीत महाराष्ट्रभर नावलौकिक प्राप्त केलेल्या साखराळेच्या राजारामबापू व रेठरे बुद्रुकच्या यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्यात बहे (ता. वाळवा) येथील प्रत्येकी दोन असे चार संचालक एकाचवेळी कार्यरत आहेत. त्यामुळे रामलिंग बेटासाठी प्रसिध्द असलेल्या बहेची ‘साखर संचालकांचे गाव’ म्हणून नवीन ओळख निर्माण झाली आहे.तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्याच्या इतिहासात नोंद करावी, अशी कामगिरी श्री क्षेत्र रामलिंग बेटासाठी प्रसिध्द असणाऱ्या बहे गावाने केली आहे. वाळवा व कऱ्हाड तालुक्यातील या दोन्ही साखर कारखान्यांच्या मध्यवर्ती असणाऱ्या गावात यापूर्वी राजारामबापू कारखान्याकडे एक व कृष्णा कारखान्याकडे दोन असे तीन संचालक होते. मात्र यावेळी दोन्ही कारखान्यांनी दोन-दोन संचालकांना संधी दिल्याने त्यांच्या समर्थकांच्या भुवया उंचावल्या आहेत.नुकत्याच झालेल्या कृष्णा कारखान्याच्या अटीतटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी सहकार पॅनेलच्या माध्यमातून राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील यांच्या पत्नी सौ. जयश्री पाटील, तसेच ‘कृष्णा’चे माजी संचालक अमोल गुरव यांना निवडणुकीत उतरवले. अमोल गुरव यांनी ‘कृष्णा’च्या पटलावर दुसऱ्यांदा बाजी मारत ‘सहकार’च्या संचालक निवडीचा श्रीगणेशा केला. जयश्री पाटील याही भरघोस मतांनी निवडून आल्याने गतवर्षीची पुनरावृत्ती यावेळीही घडून आली.राजारामबापू कारखाना निवडणुकीवेळी विठ्ठलराव पाटील यांनी संचालक पदावर दावा केला होता. परंतु बेरजेच्या राजकारणात जयंत पाटील यांनी विठ्ठल पाटील यांना थांबवण्याचा सल्ला दिला होता. यावेळी सौ. सुवर्णाताई कृष्णराव पाटील यांना सलग दुसऱ्यांदा संचालक पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर जयंत पाटील यांनी दिलेला शब्द पाळत, विठ्ठल पाटील यांना तज्ज्ञ संचालकपदी काम करण्याची संधी दिली.बहे, हुबालवाडी, खरातवाडी या तिन्ही गावांचे बहुतांशी आर्थिक व्यवहार बहे विकास सोसायटीतून केले जातात. एकाच गावात चार संचालक असल्याने याचा फायदा ऊस उत्पादकांना होतो. एकाच गावातील चौघांना साखर कारखान्यात संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने, ग्रामस्थांसह त्यांच्या समर्थकांतून आनंद व्यक्त होत आहे.चारही संचालक आ. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. प्रत्येक निवडणुकीत बदलणारे गटातटाचे राजकारण या गावाला नवीन नाही. परंतु यावेळी दोन्ही कारखान्यांची सत्ता प्रबळ गटाकडे आल्याने, पुढील राजकारणावर याचा काय परिणाम होईल, हे येणारा काळच ठरविणार आहे.