शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

जैवविविधतेचा अभ्यास गरजेचा

By admin | Updated: August 30, 2015 22:41 IST

डी. एम. सावंत : वाळव्यातील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

वाळवा : जगभरातील जैवविविधतेचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मत लोकनेते मोहनराव कदम अ‍ॅग्री कॉलेज कडेगावचे प्राचार्य डॉ. डी. एम. सावंत यांनी व्यक्त केले.क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय वाळवा आणि विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे आयोजित दोन दिवसांच्या ‘जैवविविधता पर्यावरणातील बदल व शाश्वत विकास’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य विश्वास सायनाकर होते. व्यासपीठावर तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. पी. जी. भवाने, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, चिखली नाईक कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील, शिवाजी विद्यापीठाचे डॉ. एम. व्ही. संथाकुमार, डॉ. एम. आर. आबदार प्रमुख उपस्थित होते. प्राचार्य डॉ. विश्वास सायनाकर म्हणाले, विज्ञान हे प्रत्येकाला आवश्यक असल्याने महाविद्यालयात देखील कला-वणिज्यशाखेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देणे आवश्यक आहे.याप्रसंगी संशोधक डॉ. रमेश गेजगे, आर. वाय. जगताप, डॉ. एस. एस. पाटील, प्रा. रेश्मा महापुरे यांचा, परिषद सहभाग व विशेष लेख अंकातील लेखन केल्याबद्दल मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्वच सहभागी संशोधकांना प्रमाणपत्र देण्यात आले. प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. रमेश गेजगे यांनीही मनोगत व्यक्त केले.प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी यांनी स्वागत केले. प्रा. ए. व्ही. पन्हाळे यांनी परिषदेचा वृत्तांत सांगितला. प्रा. डॉ. के. खंदारे यांनी आभार मानले. प्रा. डॉ. के. आर. जाधव, प्रा. डॉ. जे. पी. कांबळे, प्रा. बी. एन. मिसाळ, प्रा. एम डी. जामदार, प्रा. डी. एच. जाधव, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. आर. आर. सावंत, डॉ. एन. एस. पाटील, प्रा. कु. एस. एस. कदम, प्रा. जे. आर. साळुंखे यानी संयोजन केले. (वार्ताहर) कीटकांची संख्या वाढतेयडॉ. सावंत म्हणाले, जैवविविधतेमुळे जमीन, हवा, पाणी यांचा चांगला परिणाम होतो. निसर्गात वाढत असणाऱ्या कीटकांवर नियंत्रण ठेवता येते. वाढते शहरीकरण; औद्योगिकरण, यातून निर्माण होणारे प्रदूषण यांच्यामुळे वातावरणात बदल होत आहे. त्याचा परिणाम म्हणून कीटकांची संख्या वाढत चालल्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.