शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाप्रती संवेदनशीलता जपण्याची गरज

By admin | Updated: June 27, 2016 00:45 IST

अरुणा ढेरे : सांगलीत दुसरे निसर्ग साहित्य संमेलन उत्साहात

सांगली : संत ज्ञानेश्वर, बहिणाबाई असो की कुसुमाग्रज, सदानंद रेगेंपर्यंत सर्वांनी निसर्गाबाबतची संवेदनशीलता साहित्य, अभंग, कवितांमधून मांडलेली आहे. आजच्या विज्ञानयुगात निसर्गाप्रती आपली संवेदनशीलता कमी होत चालली आहे. ही संवेदना जपण्याची गरज आहे, असे मत संमेलनाध्यक्षा तथा ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले. येथील आभाळमाया फाऊंडेशनच्यावतीने दुसरे निसर्ग साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून श्रीमती ढेरे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते वृक्षारोपण करून संमेलनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास प्रमोद चौगुले, तारा भवाळकर, मदनलाल रजपूत, वैजनाथ महाजन उपस्थित होते. ढेरे म्हणाल्या, साहित्यिकांनी आपल्या कवितांमधून निसर्गातील उदाहरणे देऊन जगण्याच्या व्याख्या व्यक्त केल्या आहेत. जुन्या मराठी कवितांमध्ये निसर्गप्रेमाचा धागा फार पूर्वीपासूनच आहे. ज्ञानेश्वर, बहिणाबार्इंसह अनेक संतांनी निसर्गाचे महत्त्व पटवून दिले आहे. अगदी अलीकडच्या साहित्य, कवितांतून निसर्गाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. आपण आपल्या रोजच्या धावपळीत निसर्गाकडे कधी पाहातच नाही. दिवसातून एकदाही आपण आभाळाकडे आभाळ म्हणून, तर झाडाकडे झाड म्हणून बघत नाही. विज्ञानयुगात निसर्गाप्रती संवेदना कमी झाली आहे. साहित्य, विज्ञान आणि निसर्ग यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे ही संवेदनशीलता कमी न होता जपण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्वाधिक संबंध निसर्गाशी येतो. आपण जीवन जगत असताना निसर्गाचा विचार करून निसर्गाचे संवर्धन करायला हवे आणि पुढच्या पिढीलादेखील तसे संस्कार करावेत. निसर्गाचे संवर्धन झाले नाही, तर विनाश अटळ आहे.यावेळी सुभाष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलनही झाले. यात प्रा. प्रदीप पाटील, चंद्रकांत बाबर, मनीषा पाटील, प्रा. सुनंदा शेळके, अभिजित पाटील, वसंत पाटील, भीमराव धुळूबुळू, महेश कराडकर, धनदत्त बोरगावे, नीलम माणगावे यांनी भाग घेतला. कवी संमेलनाला निसर्गप्रेमींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)