शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

निसर्गाप्रती संवेदनशीलता जपण्याची गरज

By admin | Updated: June 27, 2016 00:45 IST

अरुणा ढेरे : सांगलीत दुसरे निसर्ग साहित्य संमेलन उत्साहात

सांगली : संत ज्ञानेश्वर, बहिणाबाई असो की कुसुमाग्रज, सदानंद रेगेंपर्यंत सर्वांनी निसर्गाबाबतची संवेदनशीलता साहित्य, अभंग, कवितांमधून मांडलेली आहे. आजच्या विज्ञानयुगात निसर्गाप्रती आपली संवेदनशीलता कमी होत चालली आहे. ही संवेदना जपण्याची गरज आहे, असे मत संमेलनाध्यक्षा तथा ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले. येथील आभाळमाया फाऊंडेशनच्यावतीने दुसरे निसर्ग साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून श्रीमती ढेरे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते वृक्षारोपण करून संमेलनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास प्रमोद चौगुले, तारा भवाळकर, मदनलाल रजपूत, वैजनाथ महाजन उपस्थित होते. ढेरे म्हणाल्या, साहित्यिकांनी आपल्या कवितांमधून निसर्गातील उदाहरणे देऊन जगण्याच्या व्याख्या व्यक्त केल्या आहेत. जुन्या मराठी कवितांमध्ये निसर्गप्रेमाचा धागा फार पूर्वीपासूनच आहे. ज्ञानेश्वर, बहिणाबार्इंसह अनेक संतांनी निसर्गाचे महत्त्व पटवून दिले आहे. अगदी अलीकडच्या साहित्य, कवितांतून निसर्गाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. आपण आपल्या रोजच्या धावपळीत निसर्गाकडे कधी पाहातच नाही. दिवसातून एकदाही आपण आभाळाकडे आभाळ म्हणून, तर झाडाकडे झाड म्हणून बघत नाही. विज्ञानयुगात निसर्गाप्रती संवेदना कमी झाली आहे. साहित्य, विज्ञान आणि निसर्ग यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे ही संवेदनशीलता कमी न होता जपण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्वाधिक संबंध निसर्गाशी येतो. आपण जीवन जगत असताना निसर्गाचा विचार करून निसर्गाचे संवर्धन करायला हवे आणि पुढच्या पिढीलादेखील तसे संस्कार करावेत. निसर्गाचे संवर्धन झाले नाही, तर विनाश अटळ आहे.यावेळी सुभाष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलनही झाले. यात प्रा. प्रदीप पाटील, चंद्रकांत बाबर, मनीषा पाटील, प्रा. सुनंदा शेळके, अभिजित पाटील, वसंत पाटील, भीमराव धुळूबुळू, महेश कराडकर, धनदत्त बोरगावे, नीलम माणगावे यांनी भाग घेतला. कवी संमेलनाला निसर्गप्रेमींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)