शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

शेतकऱ्यांचे १६ कोटी केंद्र शासनाकडे अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:10 IST

सांगली : वेळेत कर्जाची परतफेड करून व्याज परताव्यासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख २४ हजार ८०८ शेतकºयांचे १६ कोटी ३९ लाख रुपये केंद्र शासनाकडे अडकले आहेत. शेतकºयांची ही हक्काची रक्कम मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी दिली.शेतकºयांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्जाचा नियमितपणे ...

सांगली : वेळेत कर्जाची परतफेड करून व्याज परताव्यासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख २४ हजार ८०८ शेतकºयांचे १६ कोटी ३९ लाख रुपये केंद्र शासनाकडे अडकले आहेत. शेतकºयांची ही हक्काची रक्कम मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी दिली.शेतकºयांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्जाचा नियमितपणे पुरवठा केला जातो. २०१५ ते २०१७ या दोन आर्थिक वर्षांच्या कालावधित पीक कर्ज घेऊन १ लाख २४ हजार ८०८ शेतकºयांनी वेळेत परतफेड केली होती. त्यामुळे ते व्याज परताव्यासाठी पात्र ठरले. मार्च २०१८ मध्ये व्याज परताव्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते, परंतु अद्यापही ही रक्कम जमा झालेली नाही.ऊस, द्राक्ष, डाळिंब, केळीसह अन्य पिकांसाठी बँकेकडून अल्प मुदतीचा कर्जपुरवठा करण्यात येतो. जिल्हा बँकेकडून विकास सोसायटीच्या माध्यमातून देण्यात येणाºया पीक कर्जावर सहा टक्के व्याज आकारणी होते. कर्ज परतफेड करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत असते. मुदतीत कर्जाची परतफेड करणाºया शेतकºयांना केंद्र आणि राज्य सरकारकडून व्याज परतावा दिला जातो.केंद्र शासनाकडून ३ टक्के सवलत मिळते. २०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षातील पात्र शेतकºयांची १६ कोटी ३९ लाख ७० हजार रुपयांची व्याज परताव्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. २०१५-१६ या आर्थिक वर्षातील ५७ हजार २७ शेतकºयांचे ३ टक्क्यांप्रमाणे ८ कोटी ८४ लाख ६५ हजार आणि २०१६-१७ मधील ६७ हजार ७८१ शेतकºयांचे ७ कोटी ५५ लाख पाच हजार रुपयांच्या व्याज परताव्याची रक्कम केंद्राकडे अडकली असल्याचे स्पष्ट झाले.शून्य व्याजदराने पडते पीककर्जसोसायटीमध्ये नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना केंद्र शासनाकडून पीक कर्जावर ३ टक्के व्याज परतावा दिला जातो. याशिवाय राज्य सरकारकडून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून एक टक्का व्याज परतावा दिला जातो. त्यामुळे एक लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळते. तसेच एक ते तीन लाखापर्यंतच्या कर्जाला दोन टक्के व्याज आकारणी केली जाते. केंद्र आणि राज्य सरकारकडून व्याज परतावा मिळाल्यानंतर जिल्हा बँक तो शेतकºयांच्या खात्यावर जमा करते.शेतकºयांसमोर अडचणीकेंद्राकडील पैसे अडकले असताना, राज्य शासनाकडून देण्यात येणाºया हिश्श्याचा व्याज परतावा जिल्हा बँकेला प्राप्त झाला आहे. संबंधित सभासदांच्या खात्यावर त्या रकमा जमा करण्यात आल्या आहेत. मात्र केंद्र शासनाकडील रक्कम न मिळाल्याने शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे व्याज परताव्याची रक्कम तात्काळ मिळणे गरजेचे आहे.