शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीला बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ : तालुक्यात साेमवारी पार पडलेल्या ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळाली आहे, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कवठेमहांकाळ : तालुक्यात साेमवारी पार पडलेल्या ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळाली आहे, तर खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. तालुक्यात काँग्रेस फक्त शहरातील कार्यालयापुरताच उरल्याचे चित्र ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दिसून येत आहे.

सोमवारी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सहा ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला. खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाला निमज आणि नांगोळे या दोन ग्रामपंचायती मिळवता आल्या, तर घोरपडे गटाला थबडेवाडी आणि चोरोची येथे विजय मिळाला. अजितराव घोरपडे गटाची इरळी आणि म्हैसाळ (एम) ही गावे राष्ट्रवादीने खेचून घेतली; तर थबडेवाडी हे गाव घोरपडे गटाला राष्ट्रवादीतील फुटीमुळे परत मिळवता आले.

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर पन्नास टक्के आणि गावकी, भावकी व विरोधाला विरोध म्हणून पन्नास टक्के अशी लढली गेली. कोणत्याही गावात विकासाचा मुद्दा हा अजेंडा म्हणून समोर आला नाही. किंबहुना कोणत्याच राजकीय पक्षाने विकासाच्या मुद्द्यावर मते मागितली नाहीत.

निवडणुकीत काही गावांत राष्ट्रवादीला खासदार गटाचे कार्यकर्ते सामील झाले हाेते, तर काही गावात राष्ट्रवादीमध्येच फूट पडली. काही ठिकाणी घोरपडे गट विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला. या निवडणुकीत खासदार पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. कधीकाळी गावगाड्याच्या सत्तेत अजितराव घोरपडे कायम अग्रेसर असायचे. खासदार पाटील यांनीही मागील ग्रामपंचायत निवडणुकीत वरचष्मा गाजवला होता. परंतु या दोघांनाही या निवडणुकीत विचार करण्याची वेळ आली आहे.

चौकट

चोरोची येथे राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत पॅनेल उभे केले होते. या गावात युवा नेते रोहित पाटील यांनी प्रचार सभाही घेतली. परंतु घोरपडे गटाचे राजाराम पाटील व स्थानिक आघाडीचे पांडुरंग यमगर यांनी या पॅनेलच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले. त्यामुळे आबा काका गटाच्या युतीला जनतेने नाकारले असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील, सुरेश पाटील, अनिताताई सगरे यांनी प्रयत्न केले, तर अजितराव घोरपडे यांच्या पहिल्या फळीतील कार्यकर्ते सक्रिय होते. काँग्रेस पक्षाने एकाही ठिकाणी निवडणूक लढवली नाही. त्यांना उमेदवार मिळणेसुद्धा मुश्किल झाले.