शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीला बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ : तालुक्यात साेमवारी पार पडलेल्या ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळाली आहे, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कवठेमहांकाळ : तालुक्यात साेमवारी पार पडलेल्या ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळाली आहे, तर खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. तालुक्यात काँग्रेस फक्त शहरातील कार्यालयापुरताच उरल्याचे चित्र ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दिसून येत आहे.

सोमवारी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सहा ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला. खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाला निमज आणि नांगोळे या दोन ग्रामपंचायती मिळवता आल्या, तर घोरपडे गटाला थबडेवाडी आणि चोरोची येथे विजय मिळाला. अजितराव घोरपडे गटाची इरळी आणि म्हैसाळ (एम) ही गावे राष्ट्रवादीने खेचून घेतली; तर थबडेवाडी हे गाव घोरपडे गटाला राष्ट्रवादीतील फुटीमुळे परत मिळवता आले.

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर पन्नास टक्के आणि गावकी, भावकी व विरोधाला विरोध म्हणून पन्नास टक्के अशी लढली गेली. कोणत्याही गावात विकासाचा मुद्दा हा अजेंडा म्हणून समोर आला नाही. किंबहुना कोणत्याच राजकीय पक्षाने विकासाच्या मुद्द्यावर मते मागितली नाहीत.

निवडणुकीत काही गावांत राष्ट्रवादीला खासदार गटाचे कार्यकर्ते सामील झाले हाेते, तर काही गावात राष्ट्रवादीमध्येच फूट पडली. काही ठिकाणी घोरपडे गट विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला. या निवडणुकीत खासदार पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. कधीकाळी गावगाड्याच्या सत्तेत अजितराव घोरपडे कायम अग्रेसर असायचे. खासदार पाटील यांनीही मागील ग्रामपंचायत निवडणुकीत वरचष्मा गाजवला होता. परंतु या दोघांनाही या निवडणुकीत विचार करण्याची वेळ आली आहे.

चौकट

चोरोची येथे राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत पॅनेल उभे केले होते. या गावात युवा नेते रोहित पाटील यांनी प्रचार सभाही घेतली. परंतु घोरपडे गटाचे राजाराम पाटील व स्थानिक आघाडीचे पांडुरंग यमगर यांनी या पॅनेलच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले. त्यामुळे आबा काका गटाच्या युतीला जनतेने नाकारले असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील, सुरेश पाटील, अनिताताई सगरे यांनी प्रयत्न केले, तर अजितराव घोरपडे यांच्या पहिल्या फळीतील कार्यकर्ते सक्रिय होते. काँग्रेस पक्षाने एकाही ठिकाणी निवडणूक लढवली नाही. त्यांना उमेदवार मिळणेसुद्धा मुश्किल झाले.