शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी-भाजप नेत्यांची खलबते

By admin | Updated: July 13, 2015 00:32 IST

जागा वाटपाचे त्रांगडे : तासगाव बाजार समितीसाठी जयंत पाटलांची भूमिका ठरणार निर्णायक

दत्ता पाटील - तासगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत मंगळवारी (ता. १४) आहे. याचदिवशी निवडणुकीच्या रणांगणाचे नेमके चित्र स्पष्ट होणार असले तरी, राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी जवळपास निश्चित मानली जात आहे. काँग्रेसलाही या आघाडीत सामावून घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या जागा वाटपाचे घोडे सन्मानजनक तोडग्यावर अडले आहे. याबाबत आमदार जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १ आॅगस्टला होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच २४४ इतके उच्चांकी अर्ज दाखल झाले आहेत. बाजार समितीवर मतदारांचे प्राबल्य असणारे राष्ट्रवादी आणि भाजप हे दोनच पक्ष आहेत. गतवेळच्या निवडणुकीत भाजपचे नेते खासदार संजय पाटील राष्ट्रवादीत होते. त्यावेळी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गटाला १२ आणि संजय पाटील यांच्या गटाला ७ अशा पध्दतीने जागावाटप झाले होते. या निवडणुकीतही कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीपासूनच भाजप आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत चर्चेला सुुरुवात झाली होती. सूतगिरणीच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी माघार घेऊन राष्ट्रवादीसोबत आघाडीचे संकेतही दिले होते. आता अर्ज मागे घेण्याची मुदत जवळ आल्यामुळे आघाडी की स्वबळावर लढायचे, याबाबत दोन्ही पक्षांत चर्चेला वेग आला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या आघाडीचा निर्णय अद्याप झाला नसला तरी, दोन्ही पक्षांचे घोडे सन्मानजनक तोडग्यावरच अडल्याचे स्पष्ट होत आहे. नेमक्या कोणी किती जागा घ्यायच्या, यावर दोन्ही पक्षात खलबते सुरू आहेत. तसेच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसला दोन जागा देण्याबाबतही चर्चा सुरु आहे. जागावाटपाबाबत चर्चा सुरु असेल, तर दोन्ही पक्षांना आघाडी मान्य आहे, हे जाहीर होते. आता राहिला प्रश्न सन्मानजनक तोडग्याचा. तर भाजपच्या नेत्यांशी सख्य असणारे आणि राष्ट्रवादीचे तालुक्याचे पालकत्व स्वीकारलेले नेते आमदार जयंत पाटील यांची भूमिका आघाडीसाठी निर्णायक ठरणार आहे. आमदार पाटील यांनी ठरवले, तर बाजार समितीसाठी आघाडीचा फॉर्म्युला निश्चित होऊन ही निवडणूक बिनविरोध किंवा एकतर्फी होऊ शकते. याबाबतचे चित्र मात्र मंगळवारीच स्पष्ट होणार आहे. भाजपचे दबावतंत्र भाजपची राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची तयारी आहे. मात्र अपेक्षित जागा मिळाल्या तरच आघाडी करायची, अन्यथा स्वबळावर लढायचे, अशी भूमिका भाजपची आहे. अपेक्षित जागा मिळविण्यासाठी भाजपने रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन स्वबळाचे बिगुल वाजवून राष्ट्रवादीवर दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.भाजपकडून १०-७-२ जागा वाटपाचा प्रस्ताव गतवेळच्या निवडणुकीतील आघाडीचा पायंडा कायम राहावा. मागील निवडणुकीप्रमाणेच १२ जागा राष्ट्रवादीने घ्याव्यात आणि ७ जागा भाजपला द्याव्यात. बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना सामावून घ्यायचे असेल तर, राष्ट्रवादीच्या २ जागा द्याव्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचा१३-४-२ चा फॉर्म्युलागत निवडणुकीवेळी खासदार गट राष्ट्रवादीत होता. बाजार समितीच्या मतदार संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे १३ जागा राष्ट्रवादीने घ्याव्यात, ६ जागा भाजपने घ्याव्यात. बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना आघाडीत घ्यायचे असेल तर, भाजपच्या २ जागा द्याव्यात.