शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

राष्ट्रवादी-भाजप नेत्यांची खलबते

By admin | Updated: July 13, 2015 00:32 IST

जागा वाटपाचे त्रांगडे : तासगाव बाजार समितीसाठी जयंत पाटलांची भूमिका ठरणार निर्णायक

दत्ता पाटील - तासगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत मंगळवारी (ता. १४) आहे. याचदिवशी निवडणुकीच्या रणांगणाचे नेमके चित्र स्पष्ट होणार असले तरी, राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी जवळपास निश्चित मानली जात आहे. काँग्रेसलाही या आघाडीत सामावून घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या जागा वाटपाचे घोडे सन्मानजनक तोडग्यावर अडले आहे. याबाबत आमदार जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १ आॅगस्टला होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच २४४ इतके उच्चांकी अर्ज दाखल झाले आहेत. बाजार समितीवर मतदारांचे प्राबल्य असणारे राष्ट्रवादी आणि भाजप हे दोनच पक्ष आहेत. गतवेळच्या निवडणुकीत भाजपचे नेते खासदार संजय पाटील राष्ट्रवादीत होते. त्यावेळी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गटाला १२ आणि संजय पाटील यांच्या गटाला ७ अशा पध्दतीने जागावाटप झाले होते. या निवडणुकीतही कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीपासूनच भाजप आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत चर्चेला सुुरुवात झाली होती. सूतगिरणीच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी माघार घेऊन राष्ट्रवादीसोबत आघाडीचे संकेतही दिले होते. आता अर्ज मागे घेण्याची मुदत जवळ आल्यामुळे आघाडी की स्वबळावर लढायचे, याबाबत दोन्ही पक्षांत चर्चेला वेग आला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या आघाडीचा निर्णय अद्याप झाला नसला तरी, दोन्ही पक्षांचे घोडे सन्मानजनक तोडग्यावरच अडल्याचे स्पष्ट होत आहे. नेमक्या कोणी किती जागा घ्यायच्या, यावर दोन्ही पक्षात खलबते सुरू आहेत. तसेच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसला दोन जागा देण्याबाबतही चर्चा सुरु आहे. जागावाटपाबाबत चर्चा सुरु असेल, तर दोन्ही पक्षांना आघाडी मान्य आहे, हे जाहीर होते. आता राहिला प्रश्न सन्मानजनक तोडग्याचा. तर भाजपच्या नेत्यांशी सख्य असणारे आणि राष्ट्रवादीचे तालुक्याचे पालकत्व स्वीकारलेले नेते आमदार जयंत पाटील यांची भूमिका आघाडीसाठी निर्णायक ठरणार आहे. आमदार पाटील यांनी ठरवले, तर बाजार समितीसाठी आघाडीचा फॉर्म्युला निश्चित होऊन ही निवडणूक बिनविरोध किंवा एकतर्फी होऊ शकते. याबाबतचे चित्र मात्र मंगळवारीच स्पष्ट होणार आहे. भाजपचे दबावतंत्र भाजपची राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची तयारी आहे. मात्र अपेक्षित जागा मिळाल्या तरच आघाडी करायची, अन्यथा स्वबळावर लढायचे, अशी भूमिका भाजपची आहे. अपेक्षित जागा मिळविण्यासाठी भाजपने रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन स्वबळाचे बिगुल वाजवून राष्ट्रवादीवर दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.भाजपकडून १०-७-२ जागा वाटपाचा प्रस्ताव गतवेळच्या निवडणुकीतील आघाडीचा पायंडा कायम राहावा. मागील निवडणुकीप्रमाणेच १२ जागा राष्ट्रवादीने घ्याव्यात आणि ७ जागा भाजपला द्याव्यात. बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना सामावून घ्यायचे असेल तर, राष्ट्रवादीच्या २ जागा द्याव्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचा१३-४-२ चा फॉर्म्युलागत निवडणुकीवेळी खासदार गट राष्ट्रवादीत होता. बाजार समितीच्या मतदार संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे १३ जागा राष्ट्रवादीने घ्याव्यात, ६ जागा भाजपने घ्याव्यात. बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना आघाडीत घ्यायचे असेल तर, भाजपच्या २ जागा द्याव्यात.