शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी-भाजप नेत्यांची खलबते

By admin | Updated: July 13, 2015 00:32 IST

जागा वाटपाचे त्रांगडे : तासगाव बाजार समितीसाठी जयंत पाटलांची भूमिका ठरणार निर्णायक

दत्ता पाटील - तासगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत मंगळवारी (ता. १४) आहे. याचदिवशी निवडणुकीच्या रणांगणाचे नेमके चित्र स्पष्ट होणार असले तरी, राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी जवळपास निश्चित मानली जात आहे. काँग्रेसलाही या आघाडीत सामावून घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या जागा वाटपाचे घोडे सन्मानजनक तोडग्यावर अडले आहे. याबाबत आमदार जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १ आॅगस्टला होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच २४४ इतके उच्चांकी अर्ज दाखल झाले आहेत. बाजार समितीवर मतदारांचे प्राबल्य असणारे राष्ट्रवादी आणि भाजप हे दोनच पक्ष आहेत. गतवेळच्या निवडणुकीत भाजपचे नेते खासदार संजय पाटील राष्ट्रवादीत होते. त्यावेळी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गटाला १२ आणि संजय पाटील यांच्या गटाला ७ अशा पध्दतीने जागावाटप झाले होते. या निवडणुकीतही कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीपासूनच भाजप आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत चर्चेला सुुरुवात झाली होती. सूतगिरणीच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी माघार घेऊन राष्ट्रवादीसोबत आघाडीचे संकेतही दिले होते. आता अर्ज मागे घेण्याची मुदत जवळ आल्यामुळे आघाडी की स्वबळावर लढायचे, याबाबत दोन्ही पक्षांत चर्चेला वेग आला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या आघाडीचा निर्णय अद्याप झाला नसला तरी, दोन्ही पक्षांचे घोडे सन्मानजनक तोडग्यावरच अडल्याचे स्पष्ट होत आहे. नेमक्या कोणी किती जागा घ्यायच्या, यावर दोन्ही पक्षात खलबते सुरू आहेत. तसेच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसला दोन जागा देण्याबाबतही चर्चा सुरु आहे. जागावाटपाबाबत चर्चा सुरु असेल, तर दोन्ही पक्षांना आघाडी मान्य आहे, हे जाहीर होते. आता राहिला प्रश्न सन्मानजनक तोडग्याचा. तर भाजपच्या नेत्यांशी सख्य असणारे आणि राष्ट्रवादीचे तालुक्याचे पालकत्व स्वीकारलेले नेते आमदार जयंत पाटील यांची भूमिका आघाडीसाठी निर्णायक ठरणार आहे. आमदार पाटील यांनी ठरवले, तर बाजार समितीसाठी आघाडीचा फॉर्म्युला निश्चित होऊन ही निवडणूक बिनविरोध किंवा एकतर्फी होऊ शकते. याबाबतचे चित्र मात्र मंगळवारीच स्पष्ट होणार आहे. भाजपचे दबावतंत्र भाजपची राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची तयारी आहे. मात्र अपेक्षित जागा मिळाल्या तरच आघाडी करायची, अन्यथा स्वबळावर लढायचे, अशी भूमिका भाजपची आहे. अपेक्षित जागा मिळविण्यासाठी भाजपने रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन स्वबळाचे बिगुल वाजवून राष्ट्रवादीवर दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.भाजपकडून १०-७-२ जागा वाटपाचा प्रस्ताव गतवेळच्या निवडणुकीतील आघाडीचा पायंडा कायम राहावा. मागील निवडणुकीप्रमाणेच १२ जागा राष्ट्रवादीने घ्याव्यात आणि ७ जागा भाजपला द्याव्यात. बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना सामावून घ्यायचे असेल तर, राष्ट्रवादीच्या २ जागा द्याव्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचा१३-४-२ चा फॉर्म्युलागत निवडणुकीवेळी खासदार गट राष्ट्रवादीत होता. बाजार समितीच्या मतदार संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे १३ जागा राष्ट्रवादीने घ्याव्यात, ६ जागा भाजपने घ्याव्यात. बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना आघाडीत घ्यायचे असेल तर, भाजपच्या २ जागा द्याव्यात.