शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आढावा बैठकीला ग्रामसभेचे स्वरूप

By admin | Updated: May 18, 2016 00:06 IST

आटपाडीत वादावादीचे प्रकार : केवळ चर्चाच; मूलभूत प्रश्नांना बगल

आटपाडी : भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या तालुक्यात खासदार संजय पाटील यांनी टंचाई निवारणाची आढावा बैठक घेतली खरी. पण खासदार पाटील यांच्या या पहिल्या बैठकीची अक्षरश: ग्रामसभा झाली. अधिकाऱ्यांच मनमानी खाबूगिरी यासह राजकारणातून अधिकाऱ्यांचा अन्यायाचा पाढा अनेकांनी अतिशय संतप्त होत मांडला. अनेकवेळा वादावादी झाली. दोन तास बैठक हाऊनही लोकांचे प्रश्न संपले नाहीत आणि बैठकीत एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. खासदार संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (मंगळवारी) येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सचिन इथापे, भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, भारत पाटील उपस्थित होते.बैठकीस अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती. बैठकीत टेंभू योजनेचे पाणी हा कळीचा मुद्दा ठरला. आटपाडी तलावातील पिण्यासाठी आरक्षित केलेले ६२ दशलक्ष घनफुट पाणी पाटबंधारे विभागाचे अभियंता आर. एस. पवार यांनी पैसे घेऊन अक्षरश: विकले. त्यामुळे आटपाडीकरांना गाळमिश्रित पाणी प्यावे लागत आहे. यावर वृत्तपत्रांनी वृत्त दिले, तर पवार यांनी त्यांची टिंगल केली.त्यांना विचारणा केली तर ते आम्ही पाण्याचे मालक आहोत, आमचं पाण्याचं दुकान आहे असे म्हणतात. त्यांनी आम्ही पितो ते पाणी पाणी प्यावे, यासह पवारांवर अशोक लवटे, नौशाद तांबोळी, राजेंद्र खरात यांच्यासह अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केली.यावर खासदार पाटील म्हणाले, अभियंता पवार यांनी पावसाचे पाणी सोडून दिले. तुमचा राग रास्त आहे. अकांडतांडव करू नका. मला तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलंय. पवार इथं फार दिवस राहणार नाहीत अशी मी व्यवस्था करतो. यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पण विशेष म्हणजे अभियंता पवार हसले! पवार यांच्या निर्लज्जपणावरही अनेकांनी हल्लाबोल केला.यावेळी सभापती सौ. सुमन देशमुख, भागवत माळी, महिपती पवार, तहसीलदार अजितसिंह पाटील, संजूकुमार सावंत, बळी मोरे, माजी सभापती अलका भोसले, आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, बंडोपंत देशमुख, स्नेहजित पोतदार यांच्यासह मान्यवर, अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)तलाव भरून घेऊ : ‘टेंभू’ची कामे मार्गी लावू२०१७ पर्यंत २२ टीएमसी पाणी टेंभू योजनेतून उचलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत नियोजन केले आहे. टेंभू योजनेचा देशातच नव्हे, तर देशाबाहेरही दुष्काळग्रस्तांची योजना असा लौकीक आहे. गेल्या वर्षभरात योजनेची बहुतांशी कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे पाणी आता पुढे सरकू लागले आहे. याचा फायदा घेऊन तालुक्यातील सर्व तलाव टेंभूच्या पाण्याने ३० ते ३५ टक्के भरून घेऊ, असे सांगत टेंभूची उर्वरित कामे २०१७ पर्यंत नक्की पूर्ण होतील, असा आशावाद खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांनी पैसे भरूनही टेंभूचे पाणी देत नाही. पाण्याचे राजकारण करून शेतकऱ्यांचे हाल केले जात आहेत, असा आरोप महिपतराव पवार यांनी केला.