शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राष्ट्रवादीच्या काळजात भाजपची ‘कट्यार’

By admin | Updated: November 30, 2015 01:13 IST

सावळजमध्ये सरपंच, उपसरपंच निवड : ‘आबांं’च्या होम पीचवर ‘काकां’ची खेळी

दत्ता पाटील -- तासगाव माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून राज्यभर ख्याती असणाऱ्या सावळज (ता. तासगाव) ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या सरपंच आणि उपसरपंचाची वर्णी लागली. सरपंच निवडीच्या निमित्ताने भाजपची सरपंच निवडीची कट्यार राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांच्या काळजात घुसल्याचे चित्र आहे, तर राष्ट्रवादीच्या दुहीचा नेमका फायदा घेत आबांच्या होम पीचवर भाजपचे खासदार संजयकाकांनी केलेली खेळी तूर्तास तरी भाजपच्या पथ्यावर पडली. एकेकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा वाहिलेल्या आर. आर. पाटील यांच्या राजकारणाची सुरुवात सावळजमधून झाली. आबांनी पहिल्यांदा सावळज जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवून राजकारणाचा पाया घातला. सावळजसह गटातील गावांनीही आबांना उच्चांकी मताधिक्यासह नेहमीच सोबत केली. सावळजच्या ग्रामपंचायत निवडणुका आबा गटाच्या बाजूने एकतर्फी झाल्या. निवडणुका झाल्याच, तर त्या आबा गटांतर्गतच दोन गटात व्हायच्या. इथे विरोधकांचे अस्तित्व नगण्य होते. मात्र काही वर्षांत अग्रणीतून फारसे पाणी वाहिले नसले तरी, राजकीय प्रवाह मात्र अनेक वळणे घेऊन गेला. त्यामुळे यावेळी झालेल्या निवडणुकांत भाजपने राष्ट्रवादीच्या एका गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवत दुसऱ्या गटावर निशाणा साधला. मात्र खासदार संजयकाकांना सावळजचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करायचा होता. त्यामुळे भापजच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय कट्यार चालवले. आता राष्ट्रवादीचे कारभारी कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. खासदार पडद्यामागून पडद्यावरसावळजच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंचायत समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात भाजप आणि राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने आणि वसंत सावंत यांच्या गटाने पॅनेल उभे केले होते. या पॅनेलच्या प्रचार पत्रकावर आर. आर. आबांसह माजी आ. दिनकरआबा पाटील यांचे छायाचित्र होते. मात्र खासदारांचे समर्थक पॅनेलमध्ये असून देखील त्यांचे छायाचित्र वगळण्यात आले होते. खा. संजयकाकांनी पडद्याआड केलेली पहिली खेळी यशस्वी ठरली. दुसऱ्या खेळीत राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनाच धक्का देत, दहा सदस्यांची मोट बांधून भाजपचा सरपंच करण्याची किमया त्यांनी साधली.राष्ट्रवादीने हक्क सोडला तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीतील नेत्यांत दावेदारी सुरु होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावळजमध्ये राष्ट्रवादीच्या एका गटासह भाजपने पॅनेल लावल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीचीच सत्ता असल्याचा दावा केला होता. मात्र सरपंच निवडीत राष्ट्रवादीला डावलल्यामुळे नेत्यांनीही या गावावर असणाऱ्या वर्चस्वाचा हक्क सोडला.