शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

महापालिका सभेत पुन्हा ‘कदम’ताल

By admin | Updated: May 21, 2016 00:12 IST

‘स्वीकृत’चा प्रस्ताव फेटाळला : कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुनील कदम यांना रोखले

कोल्हापूर : पक्षीय राजकारणातून टीकेचे लक्ष्य बनलेले माजी महापौर सुनील कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यास महानगरपालिका सभागृहाने शुक्रवारी तिसऱ्यांदा नकार दिला. एकाच विषयावर तब्बल तीन तास प्रदीर्घ चर्चा आणि दोन वेळा मतदान घेण्यात आल्यानंतर बहुमताच्या जोरावर कदम यांचा सभागृहात येण्याचा दरवाजा पुन्हा एकदा बंद झाला. यावेळी कॉँग्रेस-राष्ट्रवादी तसेच भाजप-ताराराणी आघाडी यांनी कदम यांच्या संदर्भातील आपापले अभिवादन लेखी स्वरूपात सभागृहात सादर केले. त्यापैकी कॉँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनी बहुमताच्या जोरावर ते मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज सुरू होताच सुनील कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्याचा विषय चर्चेत घेण्यात आला. कदम यांना स्वीकृत म्हणून घेण्याकरिता यापूर्वी महासभेने पारित केलेले ठराव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४५१ अन्वये निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने महापालिकेकडे पाठविला आहे. तो माहितीसाठी प्रशासनाने महासभेसमोर ठेवला होता. हा प्रस्ताव महासभेने दोन वेळा नाकारला असल्याने त्यावर आता कोणतीही चर्चा करू नये, अशी भूमिका शारंगधर देशमुख, जयंत पाटील यांनी घेतली. त्याला भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. चर्चेमुळे या विषयात वादंग निर्माण होणार हे लक्षात येताच नगरसचिव उमेश रणदिवे यांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावावर सभागृहानेच अभिवेदन करायचे आहे, असे सांगीतले. त्यावर सभागृह म्हणजे नेमके कोण? याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी मागितले. ‘सभागृह म्हणजे सर्व सदस्य’ असा खुलासा करण्यात आला. त्यावेळी कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील यांनी लेखी अभिवेदन देऊन तेच संपूर्ण सभागृहाचे आहे, असे समजून ते मंजूर करावे, असे सांगितले. भाजप-ताराराणी आघाडीचे गटनेते विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, तसेच विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनीही एक स्वतंत्र लेखी अभिवेदन दिले. त्यामुळे कोणाचे अभिवेदन स्वीकारावे आणि राज्य सरकारला पाठवावे हे ठरविण्याकरिता मतदानाचा विषय पुढे आला. आयुक्त पी. शिवशंकर, नगरसचिव उमेश रणदिवे यांनी सभागृह जो निर्णय घेईल त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल असे सांगितले. तेव्हा सर्वांनीच मतदानाचा आग्रह धरला. मतदानात कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे अभिवेदन ४१ विरुद्ध ३० मतांनी मंजूर झाले. यावेळी शिवसेनेचे तीन सदस्य तटस्थ राहिले. भाजप-ताराराणी आघाडीच्या अभिवेदनावरही मतदान झाले. त्यावेळी अभिवेदनाच्या बाजूने २९, तर विरोधात ४१ मते पडली. कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, शारंगधर देशमुख, सूरमंजिरी लाटकर, भूपाल शेटे यांनी, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, संभाजी जाधव, अजित ठाणेकर, रूपाराणी निकम, किरण नकाते, किरण शिराळे यांनी युक्तिवाद केला.