शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

महापालिका सभेत पुन्हा ‘कदम’ताल

By admin | Updated: May 21, 2016 00:12 IST

‘स्वीकृत’चा प्रस्ताव फेटाळला : कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुनील कदम यांना रोखले

कोल्हापूर : पक्षीय राजकारणातून टीकेचे लक्ष्य बनलेले माजी महापौर सुनील कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यास महानगरपालिका सभागृहाने शुक्रवारी तिसऱ्यांदा नकार दिला. एकाच विषयावर तब्बल तीन तास प्रदीर्घ चर्चा आणि दोन वेळा मतदान घेण्यात आल्यानंतर बहुमताच्या जोरावर कदम यांचा सभागृहात येण्याचा दरवाजा पुन्हा एकदा बंद झाला. यावेळी कॉँग्रेस-राष्ट्रवादी तसेच भाजप-ताराराणी आघाडी यांनी कदम यांच्या संदर्भातील आपापले अभिवादन लेखी स्वरूपात सभागृहात सादर केले. त्यापैकी कॉँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनी बहुमताच्या जोरावर ते मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज सुरू होताच सुनील कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्याचा विषय चर्चेत घेण्यात आला. कदम यांना स्वीकृत म्हणून घेण्याकरिता यापूर्वी महासभेने पारित केलेले ठराव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४५१ अन्वये निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने महापालिकेकडे पाठविला आहे. तो माहितीसाठी प्रशासनाने महासभेसमोर ठेवला होता. हा प्रस्ताव महासभेने दोन वेळा नाकारला असल्याने त्यावर आता कोणतीही चर्चा करू नये, अशी भूमिका शारंगधर देशमुख, जयंत पाटील यांनी घेतली. त्याला भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. चर्चेमुळे या विषयात वादंग निर्माण होणार हे लक्षात येताच नगरसचिव उमेश रणदिवे यांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावावर सभागृहानेच अभिवेदन करायचे आहे, असे सांगीतले. त्यावर सभागृह म्हणजे नेमके कोण? याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी मागितले. ‘सभागृह म्हणजे सर्व सदस्य’ असा खुलासा करण्यात आला. त्यावेळी कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील यांनी लेखी अभिवेदन देऊन तेच संपूर्ण सभागृहाचे आहे, असे समजून ते मंजूर करावे, असे सांगितले. भाजप-ताराराणी आघाडीचे गटनेते विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, तसेच विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनीही एक स्वतंत्र लेखी अभिवेदन दिले. त्यामुळे कोणाचे अभिवेदन स्वीकारावे आणि राज्य सरकारला पाठवावे हे ठरविण्याकरिता मतदानाचा विषय पुढे आला. आयुक्त पी. शिवशंकर, नगरसचिव उमेश रणदिवे यांनी सभागृह जो निर्णय घेईल त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल असे सांगितले. तेव्हा सर्वांनीच मतदानाचा आग्रह धरला. मतदानात कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे अभिवेदन ४१ विरुद्ध ३० मतांनी मंजूर झाले. यावेळी शिवसेनेचे तीन सदस्य तटस्थ राहिले. भाजप-ताराराणी आघाडीच्या अभिवेदनावरही मतदान झाले. त्यावेळी अभिवेदनाच्या बाजूने २९, तर विरोधात ४१ मते पडली. कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, शारंगधर देशमुख, सूरमंजिरी लाटकर, भूपाल शेटे यांनी, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, संभाजी जाधव, अजित ठाणेकर, रूपाराणी निकम, किरण नकाते, किरण शिराळे यांनी युक्तिवाद केला.