शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका सभेत पुन्हा ‘कदम’ताल

By admin | Updated: May 21, 2016 00:12 IST

‘स्वीकृत’चा प्रस्ताव फेटाळला : कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुनील कदम यांना रोखले

कोल्हापूर : पक्षीय राजकारणातून टीकेचे लक्ष्य बनलेले माजी महापौर सुनील कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यास महानगरपालिका सभागृहाने शुक्रवारी तिसऱ्यांदा नकार दिला. एकाच विषयावर तब्बल तीन तास प्रदीर्घ चर्चा आणि दोन वेळा मतदान घेण्यात आल्यानंतर बहुमताच्या जोरावर कदम यांचा सभागृहात येण्याचा दरवाजा पुन्हा एकदा बंद झाला. यावेळी कॉँग्रेस-राष्ट्रवादी तसेच भाजप-ताराराणी आघाडी यांनी कदम यांच्या संदर्भातील आपापले अभिवादन लेखी स्वरूपात सभागृहात सादर केले. त्यापैकी कॉँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनी बहुमताच्या जोरावर ते मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज सुरू होताच सुनील कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्याचा विषय चर्चेत घेण्यात आला. कदम यांना स्वीकृत म्हणून घेण्याकरिता यापूर्वी महासभेने पारित केलेले ठराव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४५१ अन्वये निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने महापालिकेकडे पाठविला आहे. तो माहितीसाठी प्रशासनाने महासभेसमोर ठेवला होता. हा प्रस्ताव महासभेने दोन वेळा नाकारला असल्याने त्यावर आता कोणतीही चर्चा करू नये, अशी भूमिका शारंगधर देशमुख, जयंत पाटील यांनी घेतली. त्याला भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. चर्चेमुळे या विषयात वादंग निर्माण होणार हे लक्षात येताच नगरसचिव उमेश रणदिवे यांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावावर सभागृहानेच अभिवेदन करायचे आहे, असे सांगीतले. त्यावर सभागृह म्हणजे नेमके कोण? याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी मागितले. ‘सभागृह म्हणजे सर्व सदस्य’ असा खुलासा करण्यात आला. त्यावेळी कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील यांनी लेखी अभिवेदन देऊन तेच संपूर्ण सभागृहाचे आहे, असे समजून ते मंजूर करावे, असे सांगितले. भाजप-ताराराणी आघाडीचे गटनेते विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, तसेच विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनीही एक स्वतंत्र लेखी अभिवेदन दिले. त्यामुळे कोणाचे अभिवेदन स्वीकारावे आणि राज्य सरकारला पाठवावे हे ठरविण्याकरिता मतदानाचा विषय पुढे आला. आयुक्त पी. शिवशंकर, नगरसचिव उमेश रणदिवे यांनी सभागृह जो निर्णय घेईल त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल असे सांगितले. तेव्हा सर्वांनीच मतदानाचा आग्रह धरला. मतदानात कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे अभिवेदन ४१ विरुद्ध ३० मतांनी मंजूर झाले. यावेळी शिवसेनेचे तीन सदस्य तटस्थ राहिले. भाजप-ताराराणी आघाडीच्या अभिवेदनावरही मतदान झाले. त्यावेळी अभिवेदनाच्या बाजूने २९, तर विरोधात ४१ मते पडली. कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, शारंगधर देशमुख, सूरमंजिरी लाटकर, भूपाल शेटे यांनी, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, संभाजी जाधव, अजित ठाणेकर, रूपाराणी निकम, किरण नकाते, किरण शिराळे यांनी युक्तिवाद केला.