शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवान्यासाठी महापालिकेतील हेलपाटे थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:26 IST

सांगली : राज्य शासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या नवीन बांधकाम नियमावलीची अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. यामध्ये १५० चौरस ...

सांगली : राज्य शासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या नवीन बांधकाम नियमावलीची अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. यामध्ये १५० चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावरील बांधकामासाठी आता महापालिकेच्या परवानगीची गरज नाही. नोंदणीकृत अभियंते, आर्किटेक्ट व सुपरवायझर यांच्या स्वाक्षरीने बांधकाम सुरू करता येणार आहे. तर १५० ते ३०० चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामांना परवानगी व पूर्णत्वाचा दाखला देण्याचे अधिकार महापालिकेच्या अभियंत्यांना दिले गेले आहेत. त्यामुळे बांधकाम परवान्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या दारात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. संपूर्ण राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी ‘एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली’ तयार करण्यात आली आहे. नुकतीच राज्य शासनाने ही नियमावली महापालिकेला लागू केली. त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सांगली महापालिकेने सुरूवात केली आहे. यामध्ये १५० चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामांना महापालिकेच्या बांधकाम परवान्याची गरज नाही. बांधकामधारकाने किंवा व्यावसायिकाने एक अर्ज तयार करून नोंदणीकृत व्यावसायिक अभियंते, आर्किटेक्ट व सुपरवायझर यांच्या स्वाक्षरीचा प्रस्ताव महापालिकेला सादर करावा लागणार आहे. महापालिकेकडे रितसर शुल्कही भरावे लागणार आहे. त्याची पोहोच म्हणजेच बांधकाम परवाना मिळाला, असे समजले जाणार आहे. शिवाय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इमारत मालकाने महापालिकेला फक्त कळविणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या परिपूर्ती प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही.

१५० ते ३०० चौरस मीटरपर्यंत बांधकाम परवानगीत सुलभता आणली आहे. ३०० चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामासाठी नोंदणीकृत व्यावसायिक अभियंते, आर्किटेक्ट व सुपरवायझर यांच्याकडून प्रस्ताव तयार करून घेणे, त्यानंतर दहा दिवसांच्या आत महापालिकेचे अभियंता शुल्काबाबत नोटीस संबंधितांना देणार आहेत. शुल्क जमा केल्यानंतर दहा दिवसातच बांधकाम परवाना दिला जाणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर परिपूर्ती प्रमाणपत्रदेखील अभियंत्यांकडून देण्यात येणार आहे.

चौकट

अभियंत्यांची नियुक्ती

आयुक्त नितीन कापडणीस यांनी नवी बांधकाम नियमावली अंमलात आणली आहे. त्यानुसार नागरिकांना बांधकाम परवाने देण्यासाठी सांगली, मिरज व कुपवाड या तीनही ठिकाणी अभियंत्यांची नियुक्तीही केली आहे. कनिष्ठ अभियंता शाहबाज शेख, रवींद्र भिंगारदेवे व आझम जमादार या तीन अधिकाऱ्यांवर परवान्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.