शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

ऊस दरासाठी साखरसम्राटांनीच आंदोलन करावे : सदाभाऊ खोत

By admin | Updated: November 7, 2014 23:35 IST

पाटील हे साखरसम्राटांचे नेते असल्याचे मानतात. त्यांनी स्वत:च्या कारखान्याचा दर ३ हजार रुपये जाहीर करुन स्वत:चे नाव गिनीज बुकात नोंदवावे,

अशोक पाटील - इस्लामपूर --गेली १५ वर्षे आमचे नेते राजू शेट्टी आणि मी ऊस दरासाठी आंदोलन करत आहे. गत आंदोलन जयंत पाटील यांनी चिघळविण्याचा प्रयत्न केला. याचा फटका लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आघाडी काँग्रेसला बसला आहे. शाहू कारखान्याने २५३0 रुपये दर जाहीर केला आहे. जयंत पाटील हे साखरसम्राटांचे नेते असल्याचे मानतात. त्यांनी स्वत:च्या कारखान्याचा दर ३ हजार रुपये जाहीर करुन स्वत:चे नाव गिनीज बुकात नोंदवावे, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला. याचवेळी त्यांनी, साखरसम्राटांनी ऊस दरासाठी आंदोलन केल्यास ते जगातील आश्चर्य ठरेल, असा टोलाही ‘लोकमत’शी बोलताना मारला.खोत म्हणाले की, खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस, कांदा, हळद अशा नगदी पिकांना दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलने केली. यामुळेच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू लागला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला केंद्रात व राज्यात चांगले दिवस आले आहेत. यामुळेच संघटनेतील काही मतलबी नेते संघटना फुटणार, अशी हवा उठवत आहेत. ज्यावेळी राजू शेट्टींपासून सदाभाऊ खोत दुरावतील, तेव्हाच संघटना फुटेल हे त्यांनी लक्षात ठेवावे.साखरसम्राटांनी आमचा आदर्श घेतला आहे. त्यांना आता लक्षात आले आहे की, ऊस उत्पादकाला दर मिळणे गरजेचे आहे. म्हणूनच जयंत पाटील गत आंदोलनापासून उसाला ३ हजार रुपये दर देण्याची भाषा करीत आहेत. जयंत पाटील यांनी परवाच बहे येथे झालेल्या एका कार्यक्रमात, आंदोलन हे कोणाच्या विरोधी नसते. उसाला दर मिळायलाच हवा. ही लोकभावना आहे. त्याचा आदर करा, असे वक्तव्य केले होते. हे आम्ही केलेल्या आंदोलनाचे फलितच म्हणावे लागेल.उसाच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरावे लागत होते. आता साखरसम्राटांनी ऊस दरासाठी आंदोलन केल्यास कोणाचेही नुकसान होणार नाही. ऊस कामगार व यंत्रणा साखरसम्राटांच्या अधिपत्याखाली असल्याने, हे आंदोलन यशस्वी होऊन उसाला ३ हजार रुपये दर मिळेल. हेच आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यश मानतो, असेही खोत यांनी यावेळी स्पष्ट केले. (वार्ताहर)आक्रमक आंदोलन हवे सदाभाऊ खोत म्हणाले की, रघुनाथ पाटील लोकसभा निवडणुकीपासून कोठे होते कोणालाच माहिती नव्हते. आम आदमी पक्षाचा नाद सोडून गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा उगवले आहेत. शेतकऱ्यांच्या ऊस दरप्रश्नी त्यांची कोल्हेकुई सुरु झाली असून त्यांनी गर्दी गोळा करण्यासाठी राज ठाकरेंचा आसरा घेतला आहे. फक्त गर्दी खेचून ऊस दर मिळत नाही, त्यासाठी रस्त्यावर येऊन आक्रमक आंदोलन करून रक्त सांडावे लागते, हे दादांनी लक्षात घेण्याची गरज आहे.