शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

विवाहापेक्षा नोंदणीचा त्रास अधिक

By admin | Updated: August 10, 2015 00:58 IST

नवविवाहितांची दमछाक : कागदपत्रांची सक्ती

सहदेव खोत- पुनवत -एकवेळ विवाह ठरविणे व विवाह करणे सोपे जाईल, परंतु सध्या विवाह नोंदणी करणे मात्र नागरिकांना फारच त्रासदायक ठरत आहे. विवाहानंतर विवाहाच्या नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे, छायाचित्रे यांची जुळणी करताना नवविवाहित जोडप्यांची पुरती दमछाक होत आहे. मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागत आहे. विवाह नोंदणीची प्रक्रिया शासनाने एवढी अवघड का केली आहे? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.सध्याच्या काळात वर्षाच्या बारा महिन्यांपैकी बहुतांशी महिन्यात विवाह होतच असतात. लोक सध्याच्या महागाईचा विचार करुन विवाहकार्य मोठा डामडौल न करता झटपट उरकून घेतात. सर्वसामान्य लोक तर ‘यादी पे शादी’ पद्धतीने विवाह उरकून घेत असल्याचे चित्र आहे.विवाहानंतर वर पक्षाकडील लोक आपापल्या भागातील ग्रामपंचायती, नगरपरिषद, महापालिका आदी ठिकाणी विवाहनोंदणी करतात, परंतु अलीकडच्या काळात विवाह नोंदणीच एवढी अवघड झालेली आहे की, नवविवाहित जोडप्यांना विवाह करताना जेवढा त्रास झालेला नसेल, तेवढा त्रास नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या जुळणीसाठी होत आहे. सध्या नोंदणीसाठी वधू-वरांचा शाळा सोडलेला दाखला, त्यांचे रेशन कार्ड झेरॉक्स, फोटो, लग्नपत्रिका, तीन साक्षीदारांचे फोटो व त्यांच्या रेशन कार्डची झेरॉक्स, पुरोहित किंवा भटजीचा दाखला व त्यांचे रेशन कार्ड झेरॉक्स अशी कागदपत्रे लागतात. ही सर्व कागदपत्रे व छायाचित्रांची व्यवस्था करताना वर पक्षाकडील मंडळींची दमछाक होत आहे. या प्रक्रियेत त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.यापूर्वीच्या काळात विवाह नोंदणी सहजरित्या करता येत होती. परंतु या प्रक्रियेसाठी शासनाने भरमसाठ कागदपत्रे व छायाचित्र सक्तीचे केल्याने सर्वसामान्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने विवाह नोंदणीसाठी पूर्वीसारखीच पद्धत अंमलात आणावी, अशी मागणी होत आहे.