शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
4
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
5
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
6
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
7
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
8
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
9
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
10
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
11
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
12
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
13
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
14
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
15
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
16
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
17
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
18
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
19
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
20
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा मूड यंदा गॅप घेण्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:25 IST

सांगली : गेल्या वर्षभरात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शिक्षणाचे तीन-तेरा वाजले आहेत. या स्थितीत सुज्ञ पालक आणि विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावी-बारावीच्या ...

सांगली : गेल्या वर्षभरात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शिक्षणाचे तीन-तेरा वाजले आहेत. या स्थितीत सुज्ञ पालक आणि विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेकडे लिटमस टेस्ट म्हणूनच पाहायचे ठरवल्याचे दिसत आहे. पुरेसा अभ्यास झालेल्या नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत ड्रॉप घेतला आहे.

यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेचा गोंधळ अजूनही पूर्णत: संपलेला नाही. परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन याची निश्चिती झालेली नाही. परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर होणार की मर्यादित अध्यापनावर याचीही स्पष्टता नाही. संपूर्ण वर्ष ऑनलाइन अभ्यास करावा लागला, त्याचा परिणाम गुणवत्तेवरही झाला. त्यामुळे अनेक पालक व विद्यार्थ्यांनी यंदाची परीक्षा नाममात्रच द्यायची ठरवली आहे. श्रेणी सुधारचा पर्याय राखून ठेवला आहे. येत्या एप्रिलमध्ये परीक्षा द्यायची; पण पुढे ऑक्टोबर आणि त्यानंतरचा मार्च-एप्रिलला पुन्हा परीक्षेला बसायचे. जास्त गुण मिळवायचे, जुने गुणपत्रक बोर्डाकडे जमा करून वाढीव गुणवत्तेच्या गुणपत्रकाच्या आधारे पुढील शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा, असे या विद्यार्थ्यांचे नियोजन आहे.

विशेषत: जेईई, नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल गॅप घेण्याकडे आहे. बारावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकल शाखेकडे जाणाऱ्यांना जास्त गुण खुणावताहेत. त्यामुळे यंदाची परीक्षा त्यांच्या दृष्टीने एक प्रकारे चाचणीच आहे. मेरिट मिळाले तर ठीक, अन्यथा हिवाळी किंवा पुढील उन्हाळ्यातील परीक्षेत स्कोअर करण्याचे त्यांचे नियोजन आहे.

चौकट

हिवाळी परीक्षेला पुनर्परीक्षार्थी वाढणार

१. यंदा दहावीसाठी सुमारे दोन हजार, तर बारावीसाठी दीड हजार विद्यार्थी पुनर्परीक्षा देत आहेत. अभ्यासक्रम शंभर टक्के न झाल्याने मर्यादित अभ्यासक्रमाच्या आधारे परीक्षा होण्याचे संकेत परीक्षा मंडळाने दिले आहेत. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न पुनर्परीक्षार्थी करत आहेत. या विद्यार्थ्यांना कोरोना एक प्रकारे लाभदायीच ठरला आहे. पुरेसा अभ्यास झालेला नसतानाही दहावी-बारावीत उत्तीर्ण होण्याची त्यांना संधी मिळाली आहे.

२. दहावीनंतर कला, वाणिज्य शाखेत ११ वी करणारे तसेच बारावीनंतर पदवी घेणारे मात्र गॅप घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यांच्या दृष्टीने ही कोरोनाची लॉटरीच आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना मेरिटची प्रचंड स्पर्धा असल्याने त्याचे विद्यार्थी मात्र गॅप घेत आहेत. ते परीक्षेला बसतील. मात्र, यंदाची गुणपत्रिका पुढील प्रवेशासाठी वापरणार नाहीत. परीक्षा मंडळाकडे जमा करून पुढील परीक्षेद्वारे जास्त गुण‌वत्तेची गुणपत्रिका मिळवतील. त्यामुळे येणाऱ्या हिवाळी परीक्षेला तसेच पुढील उन्हाळी परीक्षेला पुनर्परीक्षार्थींची संख्या खूपच असणार, हे स्पष्ट आहे.

दहावीचे परीक्षार्थी

२०२० - ३८४७३

२०२१ - ४०८४४

बारावीचे परीक्षार्थी

२०२० - ३४२६८

२०२१ - ३३०९०