शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
3
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
4
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
5
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
7
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
8
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
9
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
10
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
11
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
12
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
13
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
14
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
15
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
16
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
17
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
18
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
19
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
20
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना

अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला; लग्नसोहळे लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:25 IST

सांगली : सलग दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटात विवाहसोहळे लॉकडाऊन झाल्याने वधू-वरांच्या कुटुंबीयांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ...

सांगली : सलग दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटात विवाहसोहळे लॉकडाऊन झाल्याने वधू-वरांच्या कुटुंबीयांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दागिन्यांसह अन्य खरेदी करून लग्नसराईत मुहूर्तावर लग्न करण्याचा बेत यंदाही अपयशी ठरला आहे. कडक निर्बंध पाळत सोहळे करणे अडचणीचे ठरत असल्याने ते लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय वधू-वरांच्या कुटुंबीयांकडे राहिला नाही.

मागील वर्षातही शेकडो लग्नसोहळे लॉकडाऊनमुळे लांबणीवर गेले होते. लॉकडाऊन काळात लग्नसराई निघून जाण्याची चिन्हे असल्याने त्यानंतर मुहूर्त शोधून सोहळे करणे अनेकांना कठीण वाटत आहे. सध्या अनेक नियम शासनाने विवाहसोहळ्यांसाठी लागू केल्याने त्यांचे पालन करीत ते पार पाडणे कोणालाही शक्यता होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेकडो कुटुंबांनी त्यांच्या घरातील विवाह दोन ते तीन महिने लांबणीवर टाकले आहेत.

चौकट

मे महिन्यातील मुहूर्त

मे महिन्यात एकूण १६ मुहूर्त होते. अक्षय्य तृतीयेपर्यंत यातील सात मुहूर्त निघून गेले आहेत. आता १५, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ असे नऊ मुहूर्तच शिल्लक आहेत.

चौकट

नियमांचा अडसर मोठा

विवाहसोहळ्यांसाठी २५ माणसांची मर्यादा असून, या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. वधू किंवा वरांकडील मंडळींसाठी या चाचण्यांचा अडथळा मोठा आहे. २५ माणसांनाच निमंत्रण म्हणजे लग्नसोहळ्यात नाराजीनाट्याची निर्मिती करण्यासारखे वाटत आहे.

चौकट

यंदाही कर्तव्य नाही

कोट

वधू इंदूर येथील असल्याने माझ्या मुलाच्या लग्नसोहळ्याचे नियोजन करताना अडचणी येत आहेत. गेल्या सात महिन्यांपासून मंगलकार्य लांबणीवर टाकत आहे. नियमांचा अडथळा मोठा आहे.

- दत्तात्रय देशपांडे, वरपिता, सांगली

कोट

मुलाच्या लग्नासाठी चारवेळा तारीख पुढे ढकलली. आता लॉकडाऊन काळात नियम पाळत लग्न करणे अशक्य वाटत आहे. आणखी किती दिवस लग्न लांबणीवर जाणार हे माहीत नाही.

- पांडुरंग कोळी, सांगलीवाडी

चौकट

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले

जिल्ह्यात सध्या सुमारे ३५० मंगल कार्यालये आहेत. दरवर्षी सरासरी प्रत्येक मोठ्या मंगल कार्यालयात ३० ते ४० विवाह होतात. मार्च २०१९ पासून कोरोनामुळे विवाह कार्यांना विघ्न आले. सोहळे बंद असले तरी घरपट्टी, पाणीपट्टी, विद्युत बिल, शासनाचे अन्य कर, बँकेचे हप्ते हे द्यावेच लागतात. त्यामुळे लग्न कार्यालयांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.