शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला; लग्नसोहळे लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:25 IST

सांगली : सलग दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटात विवाहसोहळे लॉकडाऊन झाल्याने वधू-वरांच्या कुटुंबीयांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ...

सांगली : सलग दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटात विवाहसोहळे लॉकडाऊन झाल्याने वधू-वरांच्या कुटुंबीयांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दागिन्यांसह अन्य खरेदी करून लग्नसराईत मुहूर्तावर लग्न करण्याचा बेत यंदाही अपयशी ठरला आहे. कडक निर्बंध पाळत सोहळे करणे अडचणीचे ठरत असल्याने ते लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय वधू-वरांच्या कुटुंबीयांकडे राहिला नाही.

मागील वर्षातही शेकडो लग्नसोहळे लॉकडाऊनमुळे लांबणीवर गेले होते. लॉकडाऊन काळात लग्नसराई निघून जाण्याची चिन्हे असल्याने त्यानंतर मुहूर्त शोधून सोहळे करणे अनेकांना कठीण वाटत आहे. सध्या अनेक नियम शासनाने विवाहसोहळ्यांसाठी लागू केल्याने त्यांचे पालन करीत ते पार पाडणे कोणालाही शक्यता होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेकडो कुटुंबांनी त्यांच्या घरातील विवाह दोन ते तीन महिने लांबणीवर टाकले आहेत.

चौकट

मे महिन्यातील मुहूर्त

मे महिन्यात एकूण १६ मुहूर्त होते. अक्षय्य तृतीयेपर्यंत यातील सात मुहूर्त निघून गेले आहेत. आता १५, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ असे नऊ मुहूर्तच शिल्लक आहेत.

चौकट

नियमांचा अडसर मोठा

विवाहसोहळ्यांसाठी २५ माणसांची मर्यादा असून, या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. वधू किंवा वरांकडील मंडळींसाठी या चाचण्यांचा अडथळा मोठा आहे. २५ माणसांनाच निमंत्रण म्हणजे लग्नसोहळ्यात नाराजीनाट्याची निर्मिती करण्यासारखे वाटत आहे.

चौकट

यंदाही कर्तव्य नाही

कोट

वधू इंदूर येथील असल्याने माझ्या मुलाच्या लग्नसोहळ्याचे नियोजन करताना अडचणी येत आहेत. गेल्या सात महिन्यांपासून मंगलकार्य लांबणीवर टाकत आहे. नियमांचा अडथळा मोठा आहे.

- दत्तात्रय देशपांडे, वरपिता, सांगली

कोट

मुलाच्या लग्नासाठी चारवेळा तारीख पुढे ढकलली. आता लॉकडाऊन काळात नियम पाळत लग्न करणे अशक्य वाटत आहे. आणखी किती दिवस लग्न लांबणीवर जाणार हे माहीत नाही.

- पांडुरंग कोळी, सांगलीवाडी

चौकट

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले

जिल्ह्यात सध्या सुमारे ३५० मंगल कार्यालये आहेत. दरवर्षी सरासरी प्रत्येक मोठ्या मंगल कार्यालयात ३० ते ४० विवाह होतात. मार्च २०१९ पासून कोरोनामुळे विवाह कार्यांना विघ्न आले. सोहळे बंद असले तरी घरपट्टी, पाणीपट्टी, विद्युत बिल, शासनाचे अन्य कर, बँकेचे हप्ते हे द्यावेच लागतात. त्यामुळे लग्न कार्यालयांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.