शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

सांगली शहरात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST

सांगली : ‘माझ्या मुलीला मोबाईलवरून मेसेज का करतोस, तुझा मोबाईल आण’, असे म्हणत तरुणांकडून मोबाईल घेऊन पसार होण्याचा नवा ...

सांगली : ‘माझ्या मुलीला मोबाईलवरून मेसेज का करतोस, तुझा मोबाईल आण’, असे म्हणत तरुणांकडून मोबाईल घेऊन पसार होण्याचा नवा फंडा सध्या चोरट्यांनी अवलंबला आहे. शहरात अशा दोन घटना घडल्या असून, त्यात चोरट्यांनी दोन तरुणांचे मोबाईल लंपास केले.

विश्रामबाग परिसरातील दामाणी हायस्कूलजवळ २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रितेश कोलप हा तरुण मित्र गौरवसह चालत निघाला होता. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी रितेश याला ‘तू माझ्या मुलीस मोबाईलवरून मेसेज का करतोस’, असे म्हणत त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पलायन केले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत रितेश याचा चुलत भाऊ राहुल महिंद्र कोलप (वय २८) याने फिर्याद दिली आहे.

दुसरी घटना महावीर उद्यान परिसरात घडली. यात रोहित कोरे याचा मोबाईल चोरट्याने ‘तू माझ्या मुलीस त्रास देतोस’ असे म्हणत धक्काबुक्की करत काढून घेतला. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी पावणेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी दादासाहेब कोरे (वय ४२) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे.

चौकट

जबरदस्तीने मोबाईल लंपास

पाचवड (ता. वाई) येथील सागर चंद्रकांत मोरे (वय ३५) हा २८ फेब्रुवारी रोजी रात्री सांगलीतून मोटारसायकलीने घरी निघाला होता. अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ त्याला तीन तरुणांनी अडविले. त्याच्याकडील मोबाईल व ५ हजार ९०० रुपयांची रोकड असा मुद्देमाल काढून घेऊन पलायन केले. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांत नोंद झाली आहे.