शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

आमदारांनी सुचवली 9.5 कोटींची कामे

By admin | Updated: July 23, 2014 22:59 IST

वेध निवडणुकीचे : तीन महिन्यांचा कालावधी

सांगली : विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आमदारांची धडपड सुरू झाली आहे. निवडणुकीपूर्वी चालू आर्थिक वर्षाचा सर्व विकास निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील ८ आमदारांनी गेल्या तीन महिन्यांत प्रशासनाला ९ कोटी ५० लाखांची कामे सुचवली आहेत. आणखी १ कोटी ४८ लाखांचा निधी शिल्लक आहे. त्यातीलही कामे येत्या पंधरवड्यात सुचवली जाण्याची शक्यता आहे. आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी राज्य शासनातर्फे प्रत्येकी २ कोटींचा निधी दिला जातो. २०१४-१५ मधील आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा सदस्यांना १६ कोटींचा निधी मिळालेला आहे. त्यातील ५ कोटी २ लाखांचा निधी हा गेल्यावर्षीच्या अर्धवट राहिलेल्या कामांवर खर्च होत आहे. उर्वरित १० कोटी ९८ लाख रुपयांपैकी ९ कोटी ५० लाख रुपयांच्या कामाचे प्रस्ताव आमदारांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले आहेत. आमदारांनी सुचवलेल्या कामांना आता जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्याचे काम आता सुरू झाले आहे. (प्रतिनिधी)४एप्रिल ते आतापर्यंत गेल्या साडेतीन महिन्यांत हे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या विकास निधीतील आणखी केवळ १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे.४विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हा निधी खर्च करण्याचा आमदारांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विशेषत: गेल्या महिन्याभरात आमदारांकडून जिल्हा प्रशासनाकडे मोठ्याप्रमाणात कामांचे प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत. ४येत्या पंधरवड्यात या निधीतून विविध विकासकामे सुचवली जाणार आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी यांनी सांगितले की, आमदारांनी विकासकामे सुचवल्यानंतर प्रशासनातर्फे त्याला मंजुरी दिली जाते. त्या-त्या वर्षाचा निधी खर्च करण्यासाठी त्याच वर्षात कामे सुचवून मंजुरी घ्यावी लागते. यावर्षी आचारसंहितेमुळे थोडासा विलंब झाला आहे. त्याला आता गती आली आहे. ४ही मंजुरी घेतल्यानंतर हे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असते. त्या अवधित हे काम पूर्ण केले जाऊ शकते. आतापर्यंत चालू वर्षात ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी १ कोटी २६ लाखांची, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी २ कोटी ३० लाखांची, आ. मानसिंगराव नाईक यांनी २ कोटी ४८ लाखांची, आ. संभाजी पवार यांनी २ कोटी ४५ लाखांची, आ. सुरेश खाडे यांनी २ कोटीची, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ३७ लाखांची, आ. सदाशिवराव पाटील यांनी दीड कोटीची व आ. प्रकाश शेंडगे यांनी तीस लाखांची कामे सुचवली आहेत. -हा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करण्याचा अवधी आहे. आता आली जाग...मिरजेचे भाजपचे आ. सुरेश खाडे यांनी यावर्षीसाठी सुमारे एक कोटीची २५ कामे सुचवली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घाईगडबड सुरु केली आहे. त्यांच्याकडे १ कोटी ४१ लाख ९२ हजाराचा निधी उपलब्ध आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्व आमदार फंड खर्च करण्यासाठी त्यांनी धावपळ सुरु केली आहे.