शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आमदार बाबर गट आटपाडी तालुक्यात ‘फार्मात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST

अविनाश बाड आटपाडी : आटपाडी तालुक्यातील सर्व मोठ्या गावांतील ग्रामपंचायतींवर आमदार अनिल बाबर यांच्या गटाने याआधी भगवा फडकविला आहे. ...

अविनाश बाड

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील सर्व मोठ्या गावांतील ग्रामपंचायतींवर आमदार अनिल बाबर यांच्या गटाने याआधी भगवा फडकविला आहे. आता घरनिकी आणि शेटफळे या मोठ्या ग्रामपंचायतीही ताब्यात घेतल्यानेेेे आमदार बाबर यांचा गट आटपाडी तालुक्यात ‘फार्मात’ आला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांवर असलेला वचक आणि पूर्णवेळ राजकारणाला लोकांनी पसंती दिल्याचेे या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.

तालुक्यातील आटपाडीसह दिघंची, खरसुंडी, करगणी या ग्रामपंचायती यापूर्वी आमदार अनिल बाबर यांच्या ताब्यात आहेत. आताच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची झालेल्या शेटफळेची निवडणूक लक्षवेधी ठरली. आधी बिनविरोधसाठी मोठी चर्चा झालेल्या या गावात नंतर निवडणुकीने रंग भरला. या ग्रामपंचायतीवर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या गटाचे अनेक वर्षे प्राबल्य होते. मात्र, यावेळी प्रथमच बाबर यांच्या ताब्यात गेली आहे. देशमुख गटामध्ये या गावात अनेक नेते तयार झाले आहेत. त्यांच्यात एकवाक्यता नव्हती. कुरघोडीच्या राजकारणाने त्यांना पराभव पत्करावा लागला.

लेंगरेवाडी, तळेवाडी आणि धावडवाडी या ग्रामपंचायतीही शिवसेनेने ताब्यात घेतल्या आहेत, तर विठ्ठलापूर, माडगुळे आणि देशमुखवाडी या ग्रामपंचायतींवर देशमुख गटाने विजय मिळविला आहे. बाबर यांच्यासह त्यांचे काही कार्यकर्ते सदैव लोकांच्या कामांसाठी उपलब्ध होत आहेत. अगदी रुग्णवाहिका मिळवून देण्यापासून ते कोणत्याही कामासाठी लोक थेट आमदारांना फोन करीत आहेत. त्याला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लोक या गटाला पसंत करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. तळेवाडी, लेंगरेवाडीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत बाबर गटातील कार्यकर्त्यांनी युती केली होती. पडळकर सध्या राज्यभर चर्चेत असतात; पण या निवडणुकीत त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला नसल्याचे दिसून आले. देशमुख गटामध्ये विविध संस्थांमध्ये नोकरी असलेल्या कार्यकर्त्यांचा अधिक भरणा आहे. शिवाय राजेंद्रअण्णा देशमुख आणि अमरसिंह देशमुख संस्थात्मक कामात सतत व्यस्त असतात. राजेंद्रअण्णांचे पुत्र हर्षवर्धन देशमुख आणि अमरसिंह देशमुख यांचे पुत्र दिग्विजय देशमुख ही नवी पिढी अनेक इव्हेंट करून तरुण पिढीत उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसते; पण प्रशासकीय कामांमध्ये लोकांना मदत करण्यात काही ठिकाणी त्यांना मर्यादा येत असल्याने लोक बाबर गटाकडे वळत आहेत.

चौकट

नाद करा; पण आमचा कुठं?

विठ्ठलापूरला बाबर यांच्या कार्यकर्त्यांनी दोन पॅनल उभे केले. तिथे ३३ उमेदवार रिंगणात होते. त्यांच्या मतांमध्ये विभागणी झाल्याने पराभव झाला. देशमुख गटाने सर्वच्या सर्व जागा जिंकून ‘आमचा नाद करू नका’ असा संदेश दिला. माडगुळे येथेही देशमुख गटाने एकहाती सत्ता ताब्यात घेतली. याही गावांत मतदारांना गृहीत धरल्याने बाबर गटाचा मतदारांनी धुव्वा उडविला.