शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

‘मेडिकल हब’ला औषधी क्षेत्राची ‘संजीवनी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:25 IST

जिल्ह्यात औषध निर्मिती उद्योग तुलनेने कमी असलेतरी ‘रिपॅकिंग’ व्यवसाय उल्लेखनीय असल्याने अनेकांच्या हाताला रोजगारही मिळाला आहे. जिल्ह्यात सांगली-मिरजेत ...

जिल्ह्यात औषध निर्मिती उद्योग तुलनेने कमी असलेतरी ‘रिपॅकिंग’ व्यवसाय उल्लेखनीय असल्याने अनेकांच्या हाताला रोजगारही मिळाला आहे. जिल्ह्यात सांगली-मिरजेत अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून वैद्यकीय उपचार केले जात आहेत. यासाठी आवश्यक असणारी औषधांची आवक जिल्ह्यात होत असते. अगदी परदेशातून औषधे, उपकरणांचीही आयात होते. जिल्ह्यात सध्या तीन ठिकाणी औषधांची निर्मिती होते. हिमाचल प्रदेशसह गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा भागात उत्पादित औषधे येत असतात. मात्र, ती थेट न येता त्या कंपन्यांचे ‘सुपर स्टॉकिस्ट’ ते वितरीत करतात. राज्यात भिवंडी, पनवेल, पुणे आणि नागपूर याठिकाणी हे वितरक आहेत. या वितरकांकडून जिल्हा वितरक व त्यांच्याकडून दुकानदारांना औषधे उपलब्ध होता. अभिमानास्पद बाब म्हणजे जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी पुणे, मुंबईत बस्तान बसवत राज्यभरात औषध विक्रीचा विस्तार केला आहे.

रिपॅकिंगमध्ये तीळ तेल, निलगिरी तेल, बोरीक पावडर यासह आयुर्वेदिक औषधांचे रिपॅकिंग करणारे उद्योग असून त्यांचा सर्वत्र नावलौकिकही आहे.

जिल्ह्यातील वाढते पशुधन लक्षात घेता जनावरांच्या औषधांचाही उद्योग वाढत आहे. जिल्ह्यात सांगली, मिरजसह विटा आणि इस्लामपूर याठिकाणी औषधांचे वितरक कार्यरत आहेत. या वितरकांनी सांगलीसह सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि कर्नाटकातही औषध विक्री करत क्षेत्र वाढवले आहे. एकूण व्यवसायापैकी ८० टक्क्यांहून अधिक सांगली मिरजेतच एकवटला आहे.

कोट

कोरोनाची चिंताजनक स्थिती गेल्या वर्षांपासून आपण सारे अनुभवत आहोत. मात्र, यापूर्वीही नेहमीच जोखीम पत्करून औषध व्यावसायिकांनी रुग्णांची सेवा केलेली आहे. आताही कोरोना कालावधीत समोर येणारा रुग्ण कोण आहे हे न पाहता त्यास औषध मिळावे या सामाजिक बांधिलकीतून जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बांधव कार्यरत आहेत.

- विशाल दुर्गाडे, अध्यक्ष, केमिस्ट संघटना

चौकट

जिल्ह्यातील एकूण औषध व्यावसायिक २६००

होलसेल दुकानदार १५०

औषधांचे उत्पादन करणारे ३