शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

इस्लामपूरच्या नगराध्यक्षांना शहरासाठी वेळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:20 IST

इस्लामपूर : गेल्या चार वर्षांत इस्लामपूर शहराची फार बिकट अवस्था झाली आहे. नागरिकांच्या भेटीतून अनेक गंभीर प्रश्न समोर आले. ...

इस्लामपूर : गेल्या चार वर्षांत इस्लामपूर शहराची फार बिकट अवस्था झाली आहे. नागरिकांच्या भेटीतून अनेक गंभीर प्रश्न समोर आले. नगराध्यक्षांना त्यांच्या संस्थात्मक अडचणीतून शहराच्या विकासाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

कारखाना कार्यस्थळावर ते बोलत होते.

पाटील म्हणाले, शहरामध्ये सगळीकडे डेंग्यू, चिकुनगुण्या व इतर आजार पसरले आहेत. डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. आम्ही सत्तेत असताना आणलेल्या निधीतूनच कामे सुरू आहेत. मागील फडणवीस सरकारने काही निधी दिला नाही.

ते म्हणाले, प्रभाग भेटीत नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. शहरातील नागरिक माझे मतदार आहेत. त्यांना भेटणे माझे कर्तव्य आहे. त्यांनी मांडलेल्या प्रश्नांतून साथीचे आजार, रस्त्याचे प्रश्न समजले. त्यामुळे आता लोकांच्यात परिवर्तन होऊ लागले आहे. शहरातील लोक कसे राहतात याचे आश्चर्य वाटते. नगराध्यक्ष महिन्या- दीड महिन्यातून नगरपालिकेत एकदा येतात अशी माहिती मिळाली. त्यामुळे लोकांचे प्रश्न कसे सुटणार? आष्टयामध्ये तुलनेने एवढे प्रश्न नाहीत. तिथे योग्य पद्धतीने काम सुरू आहे. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांत आम्ही रस्त्यांसाठी ५ कोटींचा निधी दिला आहे. तो सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत वापरला जाईल. मागील सरकारने फक्त निधी देण्याच्या घोषणाच केल्या. निधी मिळाला असेल तर त्याचा विनियोग कसा झाला हे समजले पाहिजे, अन्यथा स्थानिक पदाधिकारी शासनाकडून निधी आणण्यात कमी पडले असावेत. यापुढे शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी आता लक्ष घालणार आहोत.