शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विट्यातील मटका एजंट भूमिगत

By admin | Updated: November 11, 2014 00:03 IST

दुकाने बंद : वातावरण स्वच्छ होण्याची प्रतीक्षा--लोकमतचादणका

विटा : खानापूर तालुक्यासह विटा शहरात खुलेआम सुरू झालेला मटका ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणताच शहरातील मटका बुकींसह एजंटही भूमिगत झाले आहेत. नव्या जोमाने सुरू झालेल्या मटका व्यवसायाबद्दल गढूळ वातावरण झाल्याने काही दिवस मटका बंद ठेवण्याचे तोंडी फर्मान काढण्यात आले असल्याचे वृत्त आहे. परंतु, हे फर्मान कोणी काढले? हा विषय मात्र आजही गुलगुस्त्यातच आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन नव्या सरकारचा शपथविधी पार पडताच, गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला कल्याण-मुंबई मटका भर चौकात आला. या व्यवसायाला कायद्याच्या रक्षकांनीच प्रतिष्ठा मिळवून दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे. हा व्यवसाय नव्या दमाने सुरू झाल्याने मटका बुकी व एजंट यांच्यात फिलगुडचे वातावरण होते. विटा शहरासह खानापूर तालुक्यात मटका सुरू झाल्याची माहिती कानोकानी मिळताच, गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायातून निवृत्ती घेतलेल्या काही एजंटांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर अनेकांनी फिल्डिंग लावून, मुख्य मटका बुकींशीही हातमिळवणी केल्याचे समजते.परंतु, कल्याण-मुंबई मटका एजंटांनी बस्तान बसविल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारी प्रसिध्द करताच मटका बुकींसह एजंटांतही मोठी खळबळ उडाली. आज, सोमवारी अनेक मटका एजंटांनी आपली खोकी बंद ठेवून भूमिगत होणे पसंत केले. आज, सोमवारी विटा शहरातील आडवी पेठ, नेवरी नाका, खानापूर नाका, चौंडेश्वरी चौक, मायणी रस्ता या ठिकाणच्या प्रमुख पाच बुकींची खोकी बंद होती. याबाबत माहिती घेतली असता, विटा शहरासह तालुक्यात नव्याने सुरू झालेल्या मटका उद्योगाबाबत रविवारपासून वातावरण गढूळ झाल्याने वातावरण स्वच्छ होईपर्यंत काही दिवसांसाठी मटका बुकी व एजंटांनी मटका व्यवसाय बंद ठेवण्याचे तोंडी फर्मान काढले असल्याचे, नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर एका नागरिकाने सांगितले. दरम्यान, गढूळ वातावरण स्वच्छ होईपर्यंत मटका उद्योग बंद ठेवण्याचे फर्मान कोणी काढले? याबाबत माहिती मिळू शकली नाही. (वार्ताहर)