शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मसुचीवाडी बिनविरोधचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरगाव : मसुचीवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत कट्टर विरोधक गुरू-शिष्य तब्बल २० वर्षांनी एकत्र आले; तरीही ग्रामपंचायत निवडणूक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बोरगाव : मसुचीवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत कट्टर विरोधक गुरू-शिष्य तब्बल २० वर्षांनी एकत्र आले; तरीही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात दोघांना अपयश आले आहे. हे दोघे पुत्रप्रेम व पुतण्याच्या प्रेमामुळे एकत्र आल्याने व हुतात्मा गटाला डावलल्याने ही निवडणूक लागल्याची चर्चा आता रंगली आहे.

मसुचीवाडी ग्रामपंचायतीत एकूण ११ जागा आहेत. यातील ९ उमेदवार याआधी बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित दोन जागांसाठी वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यापूर्वी मसुचीवाडी ग्रामपंचायतीत कायमच गुरू-शिष्य यांची काटालढत जिल्हयाने पाहिली आहे. यात गुरू पंचायतीचे माजी सदस्य दत्तूआप्पा खोत व शिष्य ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सर्जेराव कदम यांनी २० वर्षे मोठा संघर्ष केला. यातून शत्रुत्वाशिवाय काहीच भेटत नाही, हे समजल्यावर एकत्र येण्याचा निर्णय झाला. मात्र दुखावलेले कार्यकर्ते व हुतात्मा गट यांनी वॉर्ड चारमध्ये निवडणूक लावली.

ज्या कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी डोकी फोडून, भाऊबंदकीचा विरोध पत्करला, तिथे हे दोघे स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आल्याचे बोलले जात आहे. दत्तूआप्पांनी आपल्या मोठया मुलग्याला संजय कदम याला बिनविरोध केले, तर सर्जेराव कदम यांनी आपला पुतण्या शांताराम कदम याला बिनविरोध केल्याने, हे दोघे आपल्या घरात सरपंचपद बिनसंघर्षाचे यावे, या स्वार्थासाठी एकत्र आल्याची सध्या चर्चा आहे. म्हणूनच दुखावलेले कार्यकर्ते व हुतात्मा गट यांनी एका वॉर्डात निवडणूक लावल्याचे बोलले जात आहे.

चाैकट

यांची भूमिकाही महत्त्वाची

भरीस भर म्हणून रयत आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष भास्कर कदम यांचीही मोठी अडचण आहे. गतवेळच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने आयत्यावेळी त्यांच्या पत्नीला सरपंचपद डावलले होते. त्याचा राग आजही त्यांच्या मनात आहे. त्याचा डाव भास्कर कदम यावेळी काढणार का? यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.