शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

हुतात्मा स्मारकेच होताहेत ‘हुतात्मा’

By admin | Updated: January 14, 2015 23:51 IST

शिराळा तालुक्यातील स्थिती : स्मारकांच्या आवारात शेणी, कडबा; पार्ट्यांसाठीही वापर

विकास शहा - शिराळा -दिल्ली येथील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकताना पाहताना मन भरून येते. असाच जल्लोष खेड्या-पाड्यातही होतो. पण ज्यांच्या बलिदानामुळे हा देश स्वतंत्र झाला, अशा हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेली हुतात्मा स्मारके शेवटची घटका मोजत आहेत. तसेच या स्मारकांच्या आवारात शेणी रचल्या जातात, गाड्यांचे पार्किंग, कडबा भरणे, तर काही ठिकाणी चक्क पार्ट्याही केल्या जातात. हुतात्म्यांची आठवण राहावी, यासाठी बांधलेली ही हुतात्मा स्मारकेच ‘हुतात्मा’ होण्याच्या मार्गावर आहेत.शिराळा तालुका हा स्वातंत्र्य लढ्यातील एक ‘सुवर्ण पान’ आहे. स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान या तालुक्याने दिले आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्यासाठी येथील नागरिक तयार होते. काहींनी स्वत:चे दागिने, तर काहींनी आपली मुले अर्पण केली. ‘बिळाशी बंडा’ने संपूर्ण पार्लमेंट हादरुन गेले होती. या गावातील लोकांनी जंगलातून ६0 फुटाचे सागाचे लाकूड कापून आणले व महादेव मंदिराच्या आवारात तिरंगा फडकविला. गावाच्या आसपासचे नागरिक या झेंड्याच्या रक्षणासाठी अहोरात्र जागले. मानवी कडे मोडण्यासाठी पोलिसांनी मारहाण केली. यावेळी इंग्रजांनी परत जाताना मांगरुळ येथे गोळीबार केला. यामध्ये संतू कुंभार व शंकर चांभार ही दोन मुले शहीद झाली. अशाचप्रकारे तालुक्यात स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीर हुतात्मा झाले.या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मांगरुळ, बिळाशी, चरण, आरळा, मणदूर या ठिकाणी शासनाने या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण व्हावी, तसेच नवीन पिढीस चांगला आदर्श मिळावा यासाठी हुतात्मा स्मारके बांधली. ही स्मारके बांधली, मात्र त्यांची निगा राखणे व रक्षण करणे जमले नाही. याउलट या स्मारकांची विटंबना होऊ लागली आहे. या स्मारकांच्या संरक्षक भिंती पडल्या आहेत. लोखंडी गेट गायब आहेत. मुख्य स्मारकात बसविलेले पंखे, दरवाजे, खिडक्या आदी सर्व साहित्य गायब झाले आहे. आता ही स्मारकेही कधी पडतील हे सांगता येत नाही. या स्मारकात कडबा भरणे, आवारात शेणी थोपणे, तसेच वाहने पार्क करण्यात येतात. तसेच काही ठिकाणी पार्ट्याही केल्या जातात. या स्मारकांच्या आवारात लावण्यात आलेली झाडेही गायब होत आहेत. या स्मारकांचे रक्षण करण्यास कोणासच वेळ नाही.शासकीय अधिकारी निगा राखण्यासाठी निधी नसल्याचे सांगतात, ग्रामपंचायती हे आमच्या कार्यात येत नाही, तर नागरिक हे सर्व शासनाचे काम आहे, असे म्हणून या स्मारकांचा हवा तसा उपयोग करीत आहेत.२६ जानेवारी व १५ आॅगस्ट या दोन दिवशी या स्मारकांची शासनास आठवण येते. थोडी साफसफाई करून झेंडा फडकवला जातो आणि त्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’.निंगा राखण्यासाठी निंधी नाही...देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांची आठवण राहावी, या उदात्त हेतूने शासनाने गावोगावी ‘हुतात्मा’ स्मारकांची उभारणी केली खरी, पण या स्मारकांच्या देखभालीबाबत मात्र कमालीची उदासीनता आहे. देखभालीबाबत विचारले असता शासकीय अधिकारी, या स्मारकांची निगा राखण्यासाठी निधी नसल्याचे सांगतात. ग्रामपंचायत कार्यालये, हे आमच्या कार्यकक्षेत येत नाही, असे म्हणणे मांडतात, तर नागरिक, हे काम शासनाचे आहे, असे म्हणून या स्मारकांचा हवा तसा उपयोग करीत आहेत. परिणामी एका अर्थाने या स्मारकांची विटंबनाच होत आहे.