शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा स्मारकेच होताहेत ‘हुतात्मा’

By admin | Updated: January 14, 2015 23:51 IST

शिराळा तालुक्यातील स्थिती : स्मारकांच्या आवारात शेणी, कडबा; पार्ट्यांसाठीही वापर

विकास शहा - शिराळा -दिल्ली येथील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकताना पाहताना मन भरून येते. असाच जल्लोष खेड्या-पाड्यातही होतो. पण ज्यांच्या बलिदानामुळे हा देश स्वतंत्र झाला, अशा हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेली हुतात्मा स्मारके शेवटची घटका मोजत आहेत. तसेच या स्मारकांच्या आवारात शेणी रचल्या जातात, गाड्यांचे पार्किंग, कडबा भरणे, तर काही ठिकाणी चक्क पार्ट्याही केल्या जातात. हुतात्म्यांची आठवण राहावी, यासाठी बांधलेली ही हुतात्मा स्मारकेच ‘हुतात्मा’ होण्याच्या मार्गावर आहेत.शिराळा तालुका हा स्वातंत्र्य लढ्यातील एक ‘सुवर्ण पान’ आहे. स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान या तालुक्याने दिले आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्यासाठी येथील नागरिक तयार होते. काहींनी स्वत:चे दागिने, तर काहींनी आपली मुले अर्पण केली. ‘बिळाशी बंडा’ने संपूर्ण पार्लमेंट हादरुन गेले होती. या गावातील लोकांनी जंगलातून ६0 फुटाचे सागाचे लाकूड कापून आणले व महादेव मंदिराच्या आवारात तिरंगा फडकविला. गावाच्या आसपासचे नागरिक या झेंड्याच्या रक्षणासाठी अहोरात्र जागले. मानवी कडे मोडण्यासाठी पोलिसांनी मारहाण केली. यावेळी इंग्रजांनी परत जाताना मांगरुळ येथे गोळीबार केला. यामध्ये संतू कुंभार व शंकर चांभार ही दोन मुले शहीद झाली. अशाचप्रकारे तालुक्यात स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीर हुतात्मा झाले.या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मांगरुळ, बिळाशी, चरण, आरळा, मणदूर या ठिकाणी शासनाने या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण व्हावी, तसेच नवीन पिढीस चांगला आदर्श मिळावा यासाठी हुतात्मा स्मारके बांधली. ही स्मारके बांधली, मात्र त्यांची निगा राखणे व रक्षण करणे जमले नाही. याउलट या स्मारकांची विटंबना होऊ लागली आहे. या स्मारकांच्या संरक्षक भिंती पडल्या आहेत. लोखंडी गेट गायब आहेत. मुख्य स्मारकात बसविलेले पंखे, दरवाजे, खिडक्या आदी सर्व साहित्य गायब झाले आहे. आता ही स्मारकेही कधी पडतील हे सांगता येत नाही. या स्मारकात कडबा भरणे, आवारात शेणी थोपणे, तसेच वाहने पार्क करण्यात येतात. तसेच काही ठिकाणी पार्ट्याही केल्या जातात. या स्मारकांच्या आवारात लावण्यात आलेली झाडेही गायब होत आहेत. या स्मारकांचे रक्षण करण्यास कोणासच वेळ नाही.शासकीय अधिकारी निगा राखण्यासाठी निधी नसल्याचे सांगतात, ग्रामपंचायती हे आमच्या कार्यात येत नाही, तर नागरिक हे सर्व शासनाचे काम आहे, असे म्हणून या स्मारकांचा हवा तसा उपयोग करीत आहेत.२६ जानेवारी व १५ आॅगस्ट या दोन दिवशी या स्मारकांची शासनास आठवण येते. थोडी साफसफाई करून झेंडा फडकवला जातो आणि त्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’.निंगा राखण्यासाठी निंधी नाही...देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांची आठवण राहावी, या उदात्त हेतूने शासनाने गावोगावी ‘हुतात्मा’ स्मारकांची उभारणी केली खरी, पण या स्मारकांच्या देखभालीबाबत मात्र कमालीची उदासीनता आहे. देखभालीबाबत विचारले असता शासकीय अधिकारी, या स्मारकांची निगा राखण्यासाठी निधी नसल्याचे सांगतात. ग्रामपंचायत कार्यालये, हे आमच्या कार्यकक्षेत येत नाही, असे म्हणणे मांडतात, तर नागरिक, हे काम शासनाचे आहे, असे म्हणून या स्मारकांचा हवा तसा उपयोग करीत आहेत. परिणामी एका अर्थाने या स्मारकांची विटंबनाच होत आहे.