शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

भाजी मंडईच्या नावाखाली रोजचा भरतो बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:32 IST

ओळ : इस्लामपूर पालिका प्रशासनाने नियोजन करूनही पुन्हा रस्त्यावर भरलेली भाजी मंडई. अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : ...

ओळ : इस्लामपूर पालिका प्रशासनाने नियोजन करूनही पुन्हा रस्त्यावर भरलेली भाजी मंडई.

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : शहरातील आठवडी बाजार बंद केले असले तरी मंडईच्या नावाखाली रहदारीच्या रस्त्यावर रोजच बाजार भरत आहे. याठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. या फळभाजी विक्रेत्यांचे पालिका प्रशासनाकडून नियोजन होत नाही. त्यामुळे मुख्य चौकातील रस्त्यावरच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली आहे.

‘लोकमत’ने रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडीवर वेळोवेळी आवाज उठविला आहे. तरीसुद्धा कोरोनाच्या महामारीत इस्लामपूर आणि परिसरातील भाजी विक्रेते रस्त्यावरच बसतात. याचे पालिका प्रशासनाकडून नियोजन होत नाही. पोलीस खात्याकडून एक वाहन आणि पालिकेचे एक वाहन अशा दोन वाहनांतून गर्दी करू नये, असा संदेश देत फिरण्यापलीकडे हे कर्मचारी नियोजन करत नसल्याने रस्त्यावरील गर्दी वाढतच चालली आहे.

बसस्थानक ते आझाद चौक मुुख्य रस्त्यावरच भाजी विक्रेते बसलेले असतात. शिराळा नाका परिसरातील वर्दळीच्या रस्त्यावरच भाजी विक्रेते दिसतात. यल्लम्मा चौक ते मामलेदार कचेरीदरम्यान असणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावर पन्नासहून अधिक फळविक्रेत्यांच्या गाड्या याठिकाणी असल्याने ग्राहकांची गर्दी असते. वाळवा बझार ते केबीपी कॉलेजपर्यंत हातगाडे, भाजी विक्रेते यांची रेलचेल असून दररोज पालिका प्रशासनाकडून या विक्रेत्यांना सूचना दिल्या जातात, पुन्हा नऊनंतर अकरा वाजेपर्यंत गर्दीची जैसे थे परिस्थिती निर्माण होऊन कोरोनाला आमंत्रितच केले जात आहे.

चौकट

ठोस उपाय हवेत

गुरुवार हा बाजाराचा दिवस मानला जातो. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. याचे नियोजन करण्यासाठी स्वत: मुख्याधिकारी अरविंद माळी आपल्या फौजफाट्यासह रस्त्यावर उतरले; परंतु काही तासातच पुन्हा रस्ते गजबजताना दिसतात. यावर ठोस उपाय करण्याची वेळ पालिकेवर येऊन ठेपली आहे.

चौकट

...त्यामुळे गर्दी

कोरोनाच्या महामारीत छोटे-मोठे व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच आता पुन्हा १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढल्याने शहरातील इतर व्यावसायिकांनी आपली दुकाने अर्धवट उघडून विक्री सुरू केली आहे. त्यामुळे रस्त्यावर ग्राहकांची गर्दी वाढत आहे.