शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या घरावर मोर्चा काढणार

By admin | Updated: December 8, 2015 00:32 IST

रघुनाथ पाटील : म्हैसाळ योजनेची थकबाकी सात-बारावर चढू देणार नाही

सांगली : दुष्काळी भागातील टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या म्हैसाळ योजनेची थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून चालू आहे. अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी, त्यांच्यावर अन्याय होत असून, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सात-बारावर थकबाकी चढवू देणार नाही, असे सांगत, हा प्रकार त्वरित न थांबल्यास खासदारांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.पाटील पुढे म्हणाले, म्हैसाळ योजनेची थकबाकी पूर्णपणे शासनाने भरणे आवश्यक असताना, प्रशासनाने मात्र ही थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याची कार्यवाही चालू केली आहे. थकबाकी वसुलीचा हा पर्याय अजब असून, यात शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले जाणार आहेत. मुळात या योजनेची लादण्यात आलेली थकबाकी ही मनमानी पध्दतीने आकारण्यात आल्याने, शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही थकबाकी भरु नये. यासाठी शेतकऱ्यांवर दबाव आल्यास शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. तरीही प्रशासनाने थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविल्यास, खासदारांच्या घरावर संघटनेच्यावतीने मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उसाच्या ‘एफआरपी’बाबत ते म्हणाले, कोणताही कायदा नसताना केवळ परिपत्रकाच्या आधारे एक टन उसाला ४ हजार कर सरकार घेते. परंतु, एफआरपीबाबत कायदा असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. एफआरपी कारखानदारांना बंधनकारक करावी. यासाठी निधीची तरतूद कशी करावयाची हा सरकारचा प्रश्न असून, एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या केंद्र शासनाकडून जाहीर झालेला सातवा वेतन आयोग देण्यात येऊ नये. कारण हा आयोग देऊन, ऐतखाऊंना पोसण्याचे काम शासन करणार आहे. वेतन आयोग लागू करण्यास संघटनेचा विरोध राहील. (प्रतिनिधी)शर्यतीवरील बंदी उठवा : उद्या मिरजेत बैठकगोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्यात यावा, बैलगाडी, घोडागाडी शर्यतीवरील बंदी उठवावी, यांसह सर्व मागण्यांसाठी संघटनेच्यावतीने बुधवार, दि. ९ डिसेंबरला मिरज येथील किसान चौकात सभेचे आयोजन केले असून, या सभेस देशातील शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित राहणार असल्याचेही रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.