शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण रद्द हाेण्यास मराठा आमदार-खासदारच जबाबदार : विजयसिंह महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:28 IST

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. याला मराठा आमदार, खासदार आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय सर्वस्वी ...

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. याला मराठा आमदार, खासदार आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय सर्वस्वी जबाबदार आहे. गेल्या ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ आरक्षण व इतर सोयीसुविधांसाठी मराठा समाज लढा देत आहे. विलासराव देशमुख यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी बैठका घेऊन मराठा आरक्षण किती गरजेचे आहे ते पटवून दिले आहे. यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. त्या धर्तीवर न्यायमूर्ती गायकवाड समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने पडताळून घ्यायला पाहिजे होता. मात्र असे न करता मराठा समाजाला आरक्षण न देण्याचा दुर्दैवी निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षण प्रकरण चिघळण्यापूर्वी आणि समाजाचा उद्रेक होण्यापूर्वी राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावीत. याकडे दुर्लक्ष केल्यास राज्य सरकारबरोबरच आमदार, खासदार, मराठा नेतेमंडळी, मराठा उद्योजक व गर्भश्रीमंत मराठा यांना हातात दांडकी घेऊन वठणीवर आणावे लागेल.

- विजयसिंह महाडिक

संस्थापक, अखिल भारतीय मराठा सेवा संघ व मराठा आरक्षण समन्वय समिती