शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

औरंगजेबला जन्माचा धडा शिकवणारी ‘माणगंगा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST

माणदेशाचे संदर्भ थेट राष्ट्रकुट काळापर्यंत जातात. इसवीसनाच्या पाचव्या शतकात येथे राष्ट्रकुट राजे राज्य करत हाेते. मानांक हा या साम्राज्याचा ...

माणदेशाचे संदर्भ थेट राष्ट्रकुट काळापर्यंत जातात. इसवीसनाच्या पाचव्या शतकात येथे राष्ट्रकुट राजे राज्य करत हाेते. मानांक हा या साम्राज्याचा मूळपुरुष. त्याच्या नावावरून या प्रदेशाला माणदेश तसेच या प्रदेशातून वाहणाऱ्या नदीला माणगंगा असे नाव पडले. माणगंगा ही भीमा नदीची उपनदी. सातारा जिल्ह्यातील दहिवाडीजवळ कुळकजाई येथे सीतामाईच्या डोंगररांगामध्ये ती उगम पावते. तिथे सीतामाईचे मंदिर आहे. शिवाय, जवळच बाणगंगा नदीचाही उगम होतो. येथून माण नदी जमिनीत लुप्त होते. ती पुन्हा डोंगराच्या दुसऱ्या बाजूला उमाळ्याच्या स्वरूपात उगम पावते. तेथून पुढे मात्र अखंड ८ कि.मी. अंतरावरील आंधळी धरणापर्यंत ओघळ स्वरूपात वाहते. १५१ किलाेमीटर लांबीची ही नदी साेलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यानजीक सरकोळीजवळ भीमा नदीस जाऊन मिळते. उगमापासून म्हणजे कुळकजाई ते सरकोळी येथे भीमा नदीच्या संगमापर्यंत माणगंगेला एकूण बेचाळीस लहान-मोठे ओहोळ, ओढे आणि उपनद्या मिळतात.

कायम दुष्काळी असलेल्या माणदेशातून वाहणारी माणगंगा बारमाही काेरडीच दिसते. माणदेशाच्या भूमीचे वैशिष्ट्य म्हणजे, इथली माती. ही माती माण माती या नावानेच प्रसिद्ध आहे. माणदेशातील सर्व ओढे किंवा माणगंगा नदी ही वर्षातून १० ते ११ महिने कोरडीच असते. परंतु, नदीकाठच्या किंवा ओढ्याकाठच्या ५०० फुटांहून अधिक भागातील विहिरींना उन्हाळ्यातसुद्धा पाणी असते.

शिवकाळातील माणगंगेच्या एका अनाेख्या पराक्रमामुळे मुघल सम्राट औरंगजेबला चांगलाच धडा मिळाला हाेता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य संपविण्यासाठी महाराष्ट्रात उतरलेल्या औरंगजेबचा १६९८ ते १७०३ या कालावधीत शंभू महादेवाच्या डाेंगररांगांमध्येच मुक्काम हाेता. सन १७०० च्या सप्टेंबरमध्ये ताे दुष्काळी टापूत बारमाही काेरड्या सध्याच्या सांगाेला तालुक्यातील खवासपूर येथे त्याचा तळ हाेता. १ ऑक्टाेबर राेजी अचानक परतीचा पाऊस झाला आणि काेरडी माणगंगा अक्षरश: दुथडी भरून वाहू लागली. नदीपात्रातील औरंगजेबचे शामियाने, फाैजफाटा, खजिना अक्षरश: वाहून गेला. महापुरातून सुटका करून घेताना या मुघल सम्राटाचा पाय माेडला. पुढे आयुष्यभर औरंगजेब लंगडत चालत हाेता.

नंतरच्या काळात ब्रिटिशांनी राजेवाडी येथे तलाव निर्माण केला. बारमाही काेरडी असली तरी माणगंगेच्या पात्रामध्ये मुबलक प्रमाणात वाळू आहे. माणगंगेला बारमाही वाहती करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेचे प्रयाेग झाले. सध्या लोकवर्गणी आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून माणगंगा पात्राच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे.

- दत्तात्रय शिंदे