शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

माळ बंगला पंप हाऊस बंद पाडले!

By admin | Updated: July 24, 2014 23:11 IST

नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा : शुध्दीकरण न करताच पाणी; पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारला

सांगली : शहराला अनेक दिवसांपासून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर आज (गुरुवार) महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांच्यासह पाच ते सहा नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी थेट माळ बंगल्यावरील महापालिकेच्या पाणी शुध्दीकरण केंद्राला भेट दिली, त्यावेळी पंप हाऊस दोनमधून शुध्दीकरण न करताच शहराला पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील यांना बोलावून घेऊन याचा जाब विचारला. त्यानंतर या पंपहाऊसचे काम बंद पाडले. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सांगली व कुपवाड शहराला गढूळ, मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत आंदोलने सुरू असून, नागरिकांच्याही अनेक तक्रारी नगरसेवकांकडे आल्या होत्या. आज सकाळी अनेक नागरिकांनी महापालिकेत येऊन पाण्यासंदर्भात तक्रारी केल्या. यानंतर सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास महापौर कांबळे, उपमहापौर मजलेकर, नगरसेविका मृणाल पाटील, पुष्पलता पाटील, वंदना कदम, नगरसेवक पांडुरंग भिसे आदींनी महापालिकेतून थेट माधवनगर रस्त्यावरील माळ बंगला येथील जलशुध्दीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी पंप हाऊस दोनमधून शहराला शुध्दीकरण न करताच थेट पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील यांना बोलावून घेतले. यावेळी पाटील यांनी गेल्या चार महिन्यांपासून शुध्दीकरण केंद्र बंद असून, क्लोरीन व तुरटी टाकून पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आल्याचे सांगितले. गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने नदीवरील पंपाने पावसाचे पाणी थेट पंप हाऊसमध्ये येत आहे. यामुळे शहराला गढूळ व मातीमिश्रित पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. पदाधिकाऱ्यांनी जलशुध्दीकरण प्रक्रिया सुरू करूनच शहराला पाणी पुरवठा करण्याचे आदेश पाटील यांना दिले. त्यानंतर पंप हाऊस दोनमधून पाणीपुरवठा बंद करण्यात आला. येत्या दोन दिवसांत याची दुरुस्ती करून शहराला पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती पाणी पुरवठा अधिकारी सुनिल पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)आयुक्तांकडे तक्रार करणार यावेळी उपमहापौर पाटील, मजलेकर म्हणाले की, शहराला अपुरा पाणी पुरवठा चालेल; मात्र गढूळ पाणी पुरवठा नको. पाणी पुरवठा विभागाने यामध्ये अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. याबाबत आम्ही आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे तक्रार करण्यास गेले होतो; मात्र ते बाहेर गेले होते. उद्या ते आल्यानंतर त्यांच्याकडे तक्रार करणार असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. याबाबत सत्तारूढ गटाचे नेते मदन पाटील यांच्याकडेही तक्रार करण्यात आली.४अशुध्द पाण्याबद्दल नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया