शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

खते, बियाणांचा सुरळीत पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:28 IST

सांगली : लॉकडाऊन संपल्यानंतर खरीप हंगामासाठी खते, बी-बियाणे यांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशी सूचना ...

सांगली : लॉकडाऊन संपल्यानंतर खरीप हंगामासाठी खते, बी-बियाणे यांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या, तसेच खते, बियाणे दुकाने काही काळ उघडी ठेवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी घेण्यात आली. या बैठकीस कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, आमदार अरुण लाड, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, गोपीचंद पडळकर, सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांचा सुरळीतपणे पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. खते, बियाणे आणि कीटकनाशकांची शेतकऱ्यांना उपलब्धता वेळेत करण्यासाठी कृषी दुकाने दि. १५ मे नंतर ठरावीक वेळेत उघडण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. शेततळी आणि पांडुरंग फुंडकर योजनेतील थकीत अनुदान देण्यासाठीही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कर्जपुरवठा खरीप हंगामात एक हजार ८९० कोटी व रब्बी हंगामामध्ये ८१० कोटी असा एकूण दोन हजार ७०० कोटी कर्ज वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामातील कर्ज पुरवठा संबंधित बँकांनी सुरळीत केला पाहिजे.

चौकट

जिल्ह्यात खरीप हंगामात २५८ शेतीशाळा राबविण्यात येणार आहे. ५१ महिला शेतीशाळा राबविण्याचे नियोजन केले आहे. खरीप हंगामामध्ये विकेल ते पिकेल अंतर्गत नावीन्यपूर्ण पिकांचे नियोजन केले आहे. ज्वारी, भात, माडग्याळ मटकी, रोपाद्वारे तूर लागण, सोयाबीन ग्राम बीजोत्पादन, शेवगा लागवड व ड्रॅगन फ्रुट लागवडीचे प्रकल्प राबविणार आहे, असेही पाटील म्हणाले.

चौकट

पीक विम्यातील त्रुटी दूर करू : विश्वजीत कदम

पीक विमा योजनेत कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देत नाहीत, अशा लोकप्रतिनिधींनी तक्रारी दिल्या होत्या. यावर डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासमवेत बैठक घेऊन सुधारणा करण्यात येईल. गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचा लाभ मिळण्यासाठी व्हिसेरा व पोलिसांचा अहवाल लवकर मिळत नसल्यामुळे उशीर होत आहे. यामध्येही सुधारणा करणार आहे.