शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

खते, बियाणांचा सुरळीत पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:28 IST

सांगली : लॉकडाऊन संपल्यानंतर खरीप हंगामासाठी खते, बी-बियाणे यांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशी सूचना ...

सांगली : लॉकडाऊन संपल्यानंतर खरीप हंगामासाठी खते, बी-बियाणे यांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या, तसेच खते, बियाणे दुकाने काही काळ उघडी ठेवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी घेण्यात आली. या बैठकीस कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, आमदार अरुण लाड, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, गोपीचंद पडळकर, सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांचा सुरळीतपणे पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. खते, बियाणे आणि कीटकनाशकांची शेतकऱ्यांना उपलब्धता वेळेत करण्यासाठी कृषी दुकाने दि. १५ मे नंतर ठरावीक वेळेत उघडण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. शेततळी आणि पांडुरंग फुंडकर योजनेतील थकीत अनुदान देण्यासाठीही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कर्जपुरवठा खरीप हंगामात एक हजार ८९० कोटी व रब्बी हंगामामध्ये ८१० कोटी असा एकूण दोन हजार ७०० कोटी कर्ज वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामातील कर्ज पुरवठा संबंधित बँकांनी सुरळीत केला पाहिजे.

चौकट

जिल्ह्यात खरीप हंगामात २५८ शेतीशाळा राबविण्यात येणार आहे. ५१ महिला शेतीशाळा राबविण्याचे नियोजन केले आहे. खरीप हंगामामध्ये विकेल ते पिकेल अंतर्गत नावीन्यपूर्ण पिकांचे नियोजन केले आहे. ज्वारी, भात, माडग्याळ मटकी, रोपाद्वारे तूर लागण, सोयाबीन ग्राम बीजोत्पादन, शेवगा लागवड व ड्रॅगन फ्रुट लागवडीचे प्रकल्प राबविणार आहे, असेही पाटील म्हणाले.

चौकट

पीक विम्यातील त्रुटी दूर करू : विश्वजीत कदम

पीक विमा योजनेत कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देत नाहीत, अशा लोकप्रतिनिधींनी तक्रारी दिल्या होत्या. यावर डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासमवेत बैठक घेऊन सुधारणा करण्यात येईल. गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचा लाभ मिळण्यासाठी व्हिसेरा व पोलिसांचा अहवाल लवकर मिळत नसल्यामुळे उशीर होत आहे. यामध्येही सुधारणा करणार आहे.