शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष दलालांची नोंदणी सक्तीची करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:31 IST

सांगली : द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला, द्राक्ष दलालाची नोंदणी सक्तीची करा, या मागणीचे निवेदन कृषी मंत्री दादा ...

सांगली : द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला, द्राक्ष दलालाची नोंदणी सक्तीची करा, या मागणीचे निवेदन कृषी मंत्री दादा भुसे यांना मुंबई येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आले आहे. यावेळी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ याबाबत आदेश देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.

ते म्हणाले, सध्या द्राक्षांचा हगाम सुरू आहे. राज्यात द्राक्ष बागेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे; मात्र या द्राक्ष बागांना सुरक्षित विमा कवच नाही. सध्याची पीक विमा योजना कंपनी हिताची आहे, ती केवळ आठ महिन्यांची आहे. त्याच्या अटी चुकीच्या आणि न पूर्ण होणाऱ्या आहेत. द्राक्ष पीक विमा शेतकऱ्यांनी उतरविला आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले तरी योग्य नुकसान भरपाई मिळत नाही. म्हणून पीक विम्याचे निकष बदलणे गरजेचे आहे. जागतिक हवामान बदलत असल्याने मोसम बदलत आहे, तसेच दरवर्षी द्राक्ष हंगामात मोठ्या प्रमाणात द्राक्ष दलालाकडून शेतकऱ्याची फसवणूक होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका दलालांनी घेतला आहे. दलालांची कुठेही नोंदणी नाही आणि त्यांची कागदपत्रेही कुठेच उपलब्ध नाहीत. यामुळे दलाल काही काळ चोख व्यवसाय करतात आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना गंडा घालून पसार होतात. अशा प्रकारच्या घटना अनेक घडल्या आहेत. या दलालांना शिस्त लावण्यासाठी बाजार समिती किंवा पोलीस ठाण्यात दलालांची नोंदणी सक्तीची झाली पाहिजे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तासगाव तालुकाध्यक्ष जोतिराव जाधव, वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव, बस्तवडेचे उपसरपंच संदेश पाटील, महेश जगताप, यशपाल पाटील आदी उपस्थित होते.