शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

द्राक्ष दलालांची नोंदणी सक्तीची करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:31 IST

सांगली : द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला, द्राक्ष दलालाची नोंदणी सक्तीची करा, या मागणीचे निवेदन कृषी मंत्री दादा ...

सांगली : द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला, द्राक्ष दलालाची नोंदणी सक्तीची करा, या मागणीचे निवेदन कृषी मंत्री दादा भुसे यांना मुंबई येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आले आहे. यावेळी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ याबाबत आदेश देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.

ते म्हणाले, सध्या द्राक्षांचा हगाम सुरू आहे. राज्यात द्राक्ष बागेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे; मात्र या द्राक्ष बागांना सुरक्षित विमा कवच नाही. सध्याची पीक विमा योजना कंपनी हिताची आहे, ती केवळ आठ महिन्यांची आहे. त्याच्या अटी चुकीच्या आणि न पूर्ण होणाऱ्या आहेत. द्राक्ष पीक विमा शेतकऱ्यांनी उतरविला आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले तरी योग्य नुकसान भरपाई मिळत नाही. म्हणून पीक विम्याचे निकष बदलणे गरजेचे आहे. जागतिक हवामान बदलत असल्याने मोसम बदलत आहे, तसेच दरवर्षी द्राक्ष हंगामात मोठ्या प्रमाणात द्राक्ष दलालाकडून शेतकऱ्याची फसवणूक होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका दलालांनी घेतला आहे. दलालांची कुठेही नोंदणी नाही आणि त्यांची कागदपत्रेही कुठेच उपलब्ध नाहीत. यामुळे दलाल काही काळ चोख व्यवसाय करतात आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना गंडा घालून पसार होतात. अशा प्रकारच्या घटना अनेक घडल्या आहेत. या दलालांना शिस्त लावण्यासाठी बाजार समिती किंवा पोलीस ठाण्यात दलालांची नोंदणी सक्तीची झाली पाहिजे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तासगाव तालुकाध्यक्ष जोतिराव जाधव, वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव, बस्तवडेचे उपसरपंच संदेश पाटील, महेश जगताप, यशपाल पाटील आदी उपस्थित होते.