फोटो ओळ : वाळवा येथे महालक्ष्मी वाळवा शेतकरी उत्पादन कंपनीचे भूमिपूजन व्ही. डी. वाजे व कांचन वाजे यांच्या हस्ते झाले. यावेळी गौरव नायकवडी, स्नेहल नायकवडी, सरपंच डाॅ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर, भगवान पाटील, नंदू पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी आणि हजारो महिलांच्या हातांना काम देण्यासाठी ‘हुतात्मा’च्या महालक्ष्मी वाळवा शेतकरी उत्पादन कंपनीची स्थापना केली आहे. यात महिला व बचतगटांना वाव आहे, असे प्रतिपादन संस्थापक-प्रवर्तक गौरव नायकवडी यांनी केले.
महालक्ष्मी वाळवा शेतकरी उत्पादन कंपनीच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. तत्पूर्वी या कंपनीच्या बांधकामाचा प्रारंभ स्थापत्य अभियंता व्ही. डी. वाजे आणि कांचन वाजे यांच्या हस्ते झाला.
नायकवडी म्हणाले, कंपनीला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. कंपनीत फ्रेश फुड व्यवसाय केला जाईल. द्राक्षे, डाळिंब, मका, आदींपासून उत्पादन घेतले जाणार आहे. तसेच अंबा पल्प, टोमॅटो साॅसचेही उत्पादन होईल. हा बारमाही प्रकल्प आहे. उसाला १४ महिने पाणी देण्यापेक्षा तीन महिन्यांत ताज्या फळांची पिके शेतकऱ्यांना घेता येतील. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.
यावेळी सरपंच डाॅ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर, सरपंच दीपाली शिंदे, सरपंच प्रमिला यादव, पंचायत समितीच्या सदस्या वैशाली जाधव, प्रोजेक्ट प्रमुख स्नेहल नायकवडी, उमेश घोरपडे, मानाजी सापकर, संजय अहिर, डाॅ. राजेंद्र मुळीक, डाॅ. अशोक माळी, संजय खोत, वैभव खोत, भगवान पाटील, नंदू पाटील उपस्थित होते.