शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील लॉकडाऊन तीन दिवसांनी वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:26 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सात दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये तीन दिवसांनी वाढ करण्यात आली. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अद्यापही ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सात दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये तीन दिवसांनी वाढ करण्यात आली. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अद्यापही जादा असल्याने आता दि. १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून, पुढील निर्बंधांबाबत उद्या, सोमवारी निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील कोरोनास्थिती व लॉकडाऊनच्या अंमलबजावणीबाबत पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर लॉकडाऊनमध्ये तीन दिवसांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले. या बैठकीस कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोनास्थिती अधिक गंभीर बनत चालल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी त्याची मुदत संपणार होती. बाधितांची संख्या कमी आली असली तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर अद्यापही जास्त आहे. लॉकडाऊननंतरही तो कमी झालेला नाही. त्यामुळे तीन दिवसांनी लॉकडाऊन वाढवून सोमवारी याबाबत आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

रुग्णांना व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता वाढत असून कोणताही रुग्ण व्हेंटिलेटर उपचाराविना राहणार नाही याचे नियोजन करावे. ज्या रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे व क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांना दाखल करून घेतले जाते, अशा रुग्णालयांचे ऑडिट करावे. जत तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रमाण वाढत असल्याने ते कमी करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, अशीही सूचना त्यांनी दिली.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुमन पाटील, विक्रम सावंत, मानसिंगराव नाईक, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.

चौकट

सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. त्यासह शेतीतील इतर पिकांसाठीही शेती औषधांसह इतर घटक गरजेचे आहेत. त्यामुळे कृषी औषध दुकानदारांकडून ते घरपोच देता येतील का, याबाबत चर्चा करावी, अशी मागणी बैठकीत झाली. निर्बंध लागू असले तरी शेतकऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये, असे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मत मांडले. यावर चर्चा करून घरपोच शेती औषधे देण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले आहेत.