शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

जिल्ह्यातील लॉकडाऊन तीन दिवसांनी वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:26 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सात दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये तीन दिवसांनी वाढ करण्यात आली. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अद्यापही ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सात दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये तीन दिवसांनी वाढ करण्यात आली. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अद्यापही जादा असल्याने आता दि. १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून, पुढील निर्बंधांबाबत उद्या, सोमवारी निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील कोरोनास्थिती व लॉकडाऊनच्या अंमलबजावणीबाबत पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर लॉकडाऊनमध्ये तीन दिवसांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले. या बैठकीस कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोनास्थिती अधिक गंभीर बनत चालल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी त्याची मुदत संपणार होती. बाधितांची संख्या कमी आली असली तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर अद्यापही जास्त आहे. लॉकडाऊननंतरही तो कमी झालेला नाही. त्यामुळे तीन दिवसांनी लॉकडाऊन वाढवून सोमवारी याबाबत आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

रुग्णांना व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता वाढत असून कोणताही रुग्ण व्हेंटिलेटर उपचाराविना राहणार नाही याचे नियोजन करावे. ज्या रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे व क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांना दाखल करून घेतले जाते, अशा रुग्णालयांचे ऑडिट करावे. जत तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रमाण वाढत असल्याने ते कमी करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, अशीही सूचना त्यांनी दिली.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुमन पाटील, विक्रम सावंत, मानसिंगराव नाईक, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.

चौकट

सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. त्यासह शेतीतील इतर पिकांसाठीही शेती औषधांसह इतर घटक गरजेचे आहेत. त्यामुळे कृषी औषध दुकानदारांकडून ते घरपोच देता येतील का, याबाबत चर्चा करावी, अशी मागणी बैठकीत झाली. निर्बंध लागू असले तरी शेतकऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये, असे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मत मांडले. यावर चर्चा करून घरपोच शेती औषधे देण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले आहेत.