शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील लॉकडाऊन तीन दिवसांनी वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:26 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सात दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये तीन दिवसांनी वाढ करण्यात आली. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अद्यापही ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सात दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये तीन दिवसांनी वाढ करण्यात आली. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अद्यापही जादा असल्याने आता दि. १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून, पुढील निर्बंधांबाबत उद्या, सोमवारी निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील कोरोनास्थिती व लॉकडाऊनच्या अंमलबजावणीबाबत पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर लॉकडाऊनमध्ये तीन दिवसांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले. या बैठकीस कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोनास्थिती अधिक गंभीर बनत चालल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी त्याची मुदत संपणार होती. बाधितांची संख्या कमी आली असली तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर अद्यापही जास्त आहे. लॉकडाऊननंतरही तो कमी झालेला नाही. त्यामुळे तीन दिवसांनी लॉकडाऊन वाढवून सोमवारी याबाबत आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

रुग्णांना व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता वाढत असून कोणताही रुग्ण व्हेंटिलेटर उपचाराविना राहणार नाही याचे नियोजन करावे. ज्या रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे व क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांना दाखल करून घेतले जाते, अशा रुग्णालयांचे ऑडिट करावे. जत तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रमाण वाढत असल्याने ते कमी करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, अशीही सूचना त्यांनी दिली.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुमन पाटील, विक्रम सावंत, मानसिंगराव नाईक, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.

चौकट

सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. त्यासह शेतीतील इतर पिकांसाठीही शेती औषधांसह इतर घटक गरजेचे आहेत. त्यामुळे कृषी औषध दुकानदारांकडून ते घरपोच देता येतील का, याबाबत चर्चा करावी, अशी मागणी बैठकीत झाली. निर्बंध लागू असले तरी शेतकऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये, असे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मत मांडले. यावर चर्चा करून घरपोच शेती औषधे देण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले आहेत.