शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

समाजाला योग्य दिशा देऊन बुद्धिजीवी पिढी घडविण्यासाठी साहित्यिकांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मॄती व्याख्यानमालेत शिवशाही ते लोकशाही... या विषयावर ...

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मॄती व्याख्यानमालेत शिवशाही ते लोकशाही... या विषयावर संदीप जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षस्थानी वाळवा पंचायत समितीचे उपसभापती नेताजीराव पाटील होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : बुद्धिजीवी पिढी घडविण्यासाठी व समाजाला योग्य दिशा देण्यासाठी साहित्यिकांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप (नाशिक) यांनी केले.

ते येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘शिवशाही ते लोकशाही...’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी वाळवा पं. स. चे उपसभापती नेताजीराव पाटील होते.

यावेळी बोलताना संदीप जगताप म्हणाले, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर यांच्या विचारांचा विसर आजच्या पिढीला पडत आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांचे चरित्र आपण वाचले पाहिजे, तरच आपल्याला त्याग व समाजकार्य म्हणजे काय कळेल. आपण संरक्षणाबरोबरच शिक्षणावर खर्च करायला हवा, तरच देश भक्कम बनेल, असे सांगताना त्यांनी आजपर्यंत देशात व राज्यातील शेतकरी आत्महत्या करत होते; पण आता शेतकऱ्यांची कुटुंबच आत्महत्या करत आहेत. तरीही सरकार जागे होत नाही, ही शोकांतिका आहे. समाज जाती आणि धर्मामध्ये विभक्त होत चालला आहे, ते थांबले पाहिजे.

यावेळी सौरभ शेट्टी, कवी रमजान मुल्ला, अ‍ॅड. शमशुद्दीन संदे, मंडळाचे संस्थापक पं. स. सदस्य आनंदराव पाटील, प्रा. दीपक स्वामी, सचिव कालिदास पाटील उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा. स्वप्निल पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन जयश्री पाटील यांनी केले. बाबासाहेब गुरव यांनी आभार मांडले.