शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिक, साहित्य सुसंस्कृत, विवेकी असावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST

विटा : आदर्श साहित्य घडविण्याची जबाबदारी नवोदित साहित्यिकांवर येऊन पडली आहे. प्रतिभावंतांचे चिंतन साहित्याची गुढी उंच उभारणारी असते. आपली ...

विटा : आदर्श साहित्य घडविण्याची जबाबदारी नवोदित साहित्यिकांवर येऊन पडली आहे. प्रतिभावंतांचे चिंतन साहित्याची गुढी उंच उभारणारी असते. आपली माती, मातीत राबणारी माणसे व श्रमिक असे साहित्यांचे कितीतरी नवे विषय नवोदितांसमोर आहेत. त्याची निर्दोष मांडणी साहित्यातून झाली पाहिजे, असे सांगून साहित्यिक हा समाजसुधारक असतो. त्यामुळे साहित्यिक आणि साहित्य सभ्य, सुसंस्कृत आणि विवेकी असले पाहिजे, असे मत कवी इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.

विटा येथे मुक्तांगण वाचनालय, भारतमाता ज्ञानपीठ व साहित्य सेवा मंडळाच्यावतीने आयोजित ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात कवी भालेराव अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी कवी संमेलनाध्यक्ष गोविंद काळे, सदगुरू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्णवर-पाटील, स्वागताध्यक्षा डॉ. चंदना लोखंडे, उद्योगपती कमलाकर बीडगर, रघुराज मेटकरी, अरुण लंगोटे उपस्थित होते.

इंद्रजित भालेराव यांनी मानवाचे दु:ख हलके करण्याचे काम कवितेने केले. जात्यावरच्या ओव्यातून ग्रामीण भागातील स्त्री स्वत:चे मन मोकळे करत राहिली. ओव्या अनेक काव्यप्रकारांनी भरलेल्या असल्याने ओव्या ही मराठी स्त्रीची अस्मिता आहे. नव कवींनी कविता ताकदीने लिहिली पाहिजे. कवितेचे चिंतन, मनन आणि लेखन झाले पाहिजे, असेही सांगितले. या साहित्य संमेलनावेळी ‘तराळ अंतराळ’ या स्मरणिकेचे आणि रघुराज मेटकरी यांच्या ‘स्वांतत्र्य लढ्यातील सुवर्ण रत्ने’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी योगेश्वर मेटकरी, प्राचार्या वैशाली कोळेकर, राजू गारोळे, अभिजित निरगुडे, तात्यासाहेब शेंडगे, तोसीम शिकलगार, शंकर कांबळे, चंदन तामखडे यांच्यासह साहित्यिक व नागरिक उपस्थित होते. डॉ. चंदना लोखंडे यांनी स्वागत केले. डॉ. ऋषिकेश मेटकरी यांनी प्रास्ताविक केले. अभिजित निरगुडे यांनी आभार मानले.