शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिक, साहित्य सुसंस्कृत, विवेकी असावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST

विटा : आदर्श साहित्य घडविण्याची जबाबदारी नवोदित साहित्यिकांवर येऊन पडली आहे. प्रतिभावंतांचे चिंतन साहित्याची गुढी उंच उभारणारी असते. आपली ...

विटा : आदर्श साहित्य घडविण्याची जबाबदारी नवोदित साहित्यिकांवर येऊन पडली आहे. प्रतिभावंतांचे चिंतन साहित्याची गुढी उंच उभारणारी असते. आपली माती, मातीत राबणारी माणसे व श्रमिक असे साहित्यांचे कितीतरी नवे विषय नवोदितांसमोर आहेत. त्याची निर्दोष मांडणी साहित्यातून झाली पाहिजे, असे सांगून साहित्यिक हा समाजसुधारक असतो. त्यामुळे साहित्यिक आणि साहित्य सभ्य, सुसंस्कृत आणि विवेकी असले पाहिजे, असे मत कवी इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.

विटा येथे मुक्तांगण वाचनालय, भारतमाता ज्ञानपीठ व साहित्य सेवा मंडळाच्यावतीने आयोजित ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात कवी भालेराव अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी कवी संमेलनाध्यक्ष गोविंद काळे, सदगुरू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्णवर-पाटील, स्वागताध्यक्षा डॉ. चंदना लोखंडे, उद्योगपती कमलाकर बीडगर, रघुराज मेटकरी, अरुण लंगोटे उपस्थित होते.

इंद्रजित भालेराव यांनी मानवाचे दु:ख हलके करण्याचे काम कवितेने केले. जात्यावरच्या ओव्यातून ग्रामीण भागातील स्त्री स्वत:चे मन मोकळे करत राहिली. ओव्या अनेक काव्यप्रकारांनी भरलेल्या असल्याने ओव्या ही मराठी स्त्रीची अस्मिता आहे. नव कवींनी कविता ताकदीने लिहिली पाहिजे. कवितेचे चिंतन, मनन आणि लेखन झाले पाहिजे, असेही सांगितले. या साहित्य संमेलनावेळी ‘तराळ अंतराळ’ या स्मरणिकेचे आणि रघुराज मेटकरी यांच्या ‘स्वांतत्र्य लढ्यातील सुवर्ण रत्ने’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी योगेश्वर मेटकरी, प्राचार्या वैशाली कोळेकर, राजू गारोळे, अभिजित निरगुडे, तात्यासाहेब शेंडगे, तोसीम शिकलगार, शंकर कांबळे, चंदन तामखडे यांच्यासह साहित्यिक व नागरिक उपस्थित होते. डॉ. चंदना लोखंडे यांनी स्वागत केले. डॉ. ऋषिकेश मेटकरी यांनी प्रास्ताविक केले. अभिजित निरगुडे यांनी आभार मानले.