शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

साहित्यिक, साहित्य सुसंस्कृत, विवेकी असावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST

विटा : आदर्श साहित्य घडविण्याची जबाबदारी नवोदित साहित्यिकांवर येऊन पडली आहे. प्रतिभावंतांचे चिंतन साहित्याची गुढी उंच उभारणारी असते. आपली ...

विटा : आदर्श साहित्य घडविण्याची जबाबदारी नवोदित साहित्यिकांवर येऊन पडली आहे. प्रतिभावंतांचे चिंतन साहित्याची गुढी उंच उभारणारी असते. आपली माती, मातीत राबणारी माणसे व श्रमिक असे साहित्यांचे कितीतरी नवे विषय नवोदितांसमोर आहेत. त्याची निर्दोष मांडणी साहित्यातून झाली पाहिजे, असे सांगून साहित्यिक हा समाजसुधारक असतो. त्यामुळे साहित्यिक आणि साहित्य सभ्य, सुसंस्कृत आणि विवेकी असले पाहिजे, असे मत कवी इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.

विटा येथे मुक्तांगण वाचनालय, भारतमाता ज्ञानपीठ व साहित्य सेवा मंडळाच्यावतीने आयोजित ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात कवी भालेराव अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी कवी संमेलनाध्यक्ष गोविंद काळे, सदगुरू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्णवर-पाटील, स्वागताध्यक्षा डॉ. चंदना लोखंडे, उद्योगपती कमलाकर बीडगर, रघुराज मेटकरी, अरुण लंगोटे उपस्थित होते.

इंद्रजित भालेराव यांनी मानवाचे दु:ख हलके करण्याचे काम कवितेने केले. जात्यावरच्या ओव्यातून ग्रामीण भागातील स्त्री स्वत:चे मन मोकळे करत राहिली. ओव्या अनेक काव्यप्रकारांनी भरलेल्या असल्याने ओव्या ही मराठी स्त्रीची अस्मिता आहे. नव कवींनी कविता ताकदीने लिहिली पाहिजे. कवितेचे चिंतन, मनन आणि लेखन झाले पाहिजे, असेही सांगितले. या साहित्य संमेलनावेळी ‘तराळ अंतराळ’ या स्मरणिकेचे आणि रघुराज मेटकरी यांच्या ‘स्वांतत्र्य लढ्यातील सुवर्ण रत्ने’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी योगेश्वर मेटकरी, प्राचार्या वैशाली कोळेकर, राजू गारोळे, अभिजित निरगुडे, तात्यासाहेब शेंडगे, तोसीम शिकलगार, शंकर कांबळे, चंदन तामखडे यांच्यासह साहित्यिक व नागरिक उपस्थित होते. डॉ. चंदना लोखंडे यांनी स्वागत केले. डॉ. ऋषिकेश मेटकरी यांनी प्रास्ताविक केले. अभिजित निरगुडे यांनी आभार मानले.