शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

जिल्ह्यातील पन्नासवर कृषी केंद्रांचे परवाने रद्द

By admin | Updated: May 20, 2016 00:08 IST

कृषी विभागाची कारवाई : विक्री बंदचे आदेश

सांगली : कृषी विभागाच्यावतीने गुणवत्ता नियंत्रण अंतर्गत केलेल्या बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खतांच्या तपासणीत दोषी आढळलेल्या जिल्ह्यातील ४९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २७ कृषी औषध विक्री केंद्रांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. ६६ केंद्रांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. खरीप व रब्बी हंगामाबरोबरच इतरवेळी शेतकऱ्यांना कृषी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके योग्य दरात व दर्जेदार मिळावीत यासाठी नियोजन केले जाते. हंगामाच्या पूर्वी जिल्ह्यातील खते, बियाणांचा आढावा घेऊन, दोष आढळलेल्या कृषी औषध केंद्रांवर कारवाई केली जाते. बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खतांच्या तपासणीसाठी प्रत्येकी ११ जणांची पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील कृषी औषध दुकानांच्या तपासणीत दोष आढळलेल्या दुकानांवर निलंबनासह विक्री बंदची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात बिायाणांचे दोन उत्पादक व १३८६ विक्रेते आहेत. रासायनिक खतांचे २० उत्पादक व १९६० विक्रेते, तर कीटकनाशकांचे ३ उत्पादक व १७८७ विक्रेते आहेत. यांचे मार्चअखेर बियाणांचे ६०२ नमुने घेण्यात आले. लक्षांक म्हणून ६०४ नमुने घेण्यात आले होते. रासायनिक खतांचे ३६२ नमुने घेण्याच्या लक्षांकापोटी ४४७, तर कीटकनाशकांच्या १४५ लक्षांकाच्या पोटी १५४ नमुने तपासण्यात आले आहेत. तपासणी करण्याचे उद्दिष्ट शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. या पथकाने मार्च २०१६ अखेर जिल्ह्यातील बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांची तपासणी करून कार्यवाही केली आहे. ४९ परवाने निलंबित केले आहेत. खरीप हंगाम सुरु होण्यास थोडाच अवधी शिल्लक असतानाच, कृषी विभागाने दोषी दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारल्याने या कारवाईची चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)