शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

जिल्ह्यातील पन्नासवर कृषी केंद्रांचे परवाने रद्द

By admin | Updated: May 20, 2016 00:08 IST

कृषी विभागाची कारवाई : विक्री बंदचे आदेश

सांगली : कृषी विभागाच्यावतीने गुणवत्ता नियंत्रण अंतर्गत केलेल्या बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खतांच्या तपासणीत दोषी आढळलेल्या जिल्ह्यातील ४९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २७ कृषी औषध विक्री केंद्रांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. ६६ केंद्रांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. खरीप व रब्बी हंगामाबरोबरच इतरवेळी शेतकऱ्यांना कृषी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके योग्य दरात व दर्जेदार मिळावीत यासाठी नियोजन केले जाते. हंगामाच्या पूर्वी जिल्ह्यातील खते, बियाणांचा आढावा घेऊन, दोष आढळलेल्या कृषी औषध केंद्रांवर कारवाई केली जाते. बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खतांच्या तपासणीसाठी प्रत्येकी ११ जणांची पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील कृषी औषध दुकानांच्या तपासणीत दोष आढळलेल्या दुकानांवर निलंबनासह विक्री बंदची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात बिायाणांचे दोन उत्पादक व १३८६ विक्रेते आहेत. रासायनिक खतांचे २० उत्पादक व १९६० विक्रेते, तर कीटकनाशकांचे ३ उत्पादक व १७८७ विक्रेते आहेत. यांचे मार्चअखेर बियाणांचे ६०२ नमुने घेण्यात आले. लक्षांक म्हणून ६०४ नमुने घेण्यात आले होते. रासायनिक खतांचे ३६२ नमुने घेण्याच्या लक्षांकापोटी ४४७, तर कीटकनाशकांच्या १४५ लक्षांकाच्या पोटी १५४ नमुने तपासण्यात आले आहेत. तपासणी करण्याचे उद्दिष्ट शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. या पथकाने मार्च २०१६ अखेर जिल्ह्यातील बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांची तपासणी करून कार्यवाही केली आहे. ४९ परवाने निलंबित केले आहेत. खरीप हंगाम सुरु होण्यास थोडाच अवधी शिल्लक असतानाच, कृषी विभागाने दोषी दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारल्याने या कारवाईची चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)