शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

आहाराबाबत थोडे शरीराचेही ऐकू या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:27 IST

डॉक्टर, दोन दिवस ताप होता, लंघन केल्यावर बरे वाटले. ताप कमी आहे, फक्त भाताजी पेज घेतलीय, आता बरे वाटतेय. ...

डॉक्टर, दोन दिवस ताप होता, लंघन केल्यावर बरे वाटले. ताप कमी आहे, फक्त भाताजी पेज घेतलीय, आता बरे वाटतेय. आज थोडा वरणभात खाऊ का?, थोडे सूप घेतले तर चालेल का?

डॉक्टर आणि रुग्णांतील हे संभाषण नेहमीच ऐकायला मिळते. कोरोनामध्ये ताप हे प्राथमिक लक्षण आहे. यामध्ये पचनशक्ती खूपच कमी होते. काही खावेसे वाटत नाही. अशक्तपणा वाढतो. औषधे पचविण्याची ताकद राहत नाही. अशा रुग्णांना आयुर्वेद लंघनाचा सल्ला देते. ते फायदेशीरही ठरते. शरीरातील अवयवांना, पचनसंस्थेला विश्रांती मिळते. बिघाड दुरुस्तीसाठी शरीराला वेळ मिळतो.

आयुर्वेदाने हजारो वर्षांपासून हा आहार सिद्ध केलेला आहे; पण कोरोना काळात अंडी, मटण, चपाती यावर जोर दिसत आहे. कोरोनाग्रस्तांना प्रथिनांच्या नावाखाली दिवसातून तीन-तीनदा अंडी दिली जाताहेत. यामुळे शुद्ध शाकाहारी रुग्ण संभ्रमात आहेत, धर्मसंकटात सापडले आहेत. जीव वाचवायचा की धर्म, असे संकट आहे.

कोरोनामध्ये ताप थोडासा कमी झालेल्या रुग्णांना हलका व पातळ आहार फायदेशीर ठरतो. भाताची पेज, मुगाचे कढण थोडेथोडे घ्यावे. ते पचल्यास तूप, वरणभात, मुगाच्या डाळीची खिचडी, भुकेनुसार वरईचा भात किंवा ज्वारीची भाकरी द्यावी. या आहारात वेगळे काहीच नाही. वर्षानुवर्षे भारतीयांनी त्याचा अंगीकार केलाय. बहुतेक कोरोनाग्रस्तांना भूक नसते. मळमळ, उलटी होते. औषधांमुळे पित्त वाढते. पोट साफ होत नाही. अशावेळी पचायला जड सामिष आहार कितपत समर्थनीय आहे? अशक्तपणामुळे पोट खपाटीला लागलेल्या रुग्णाला या पैलवानी आहाराची गरज अजिबात नाही. तापामध्ये कडकडून भूक लागेपर्यंत पोट रिकामे ठेवण्याचा हमखास फायदा होतो. कोमट पाणी पिण्याचाही फायदा होतो. शरीरातील बिघाड दुरुस्तीसाठी वेळही द्यायला हवा. औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले पेजेसारखे पातळ पदार्थ अशा आजारांत कामी येतात. गूळवेल, पटोल, काडेचिराईत ही कडू रसाची औषधे प्रभावी ठरतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले शरीर वेळोवेळी सिग्नल देत असते. चक्र कुठेतरी बिघडत असल्याचे सांगत असते. अशावेळी डॉॅक्टरांकडून औषधे नक्कीच घ्या, पण आहाराच्या बाबतीत शरीराच्या डॉक्टरचेही ऐकायला शिकू या!

(लेखक सांगलीतील आयुर्वेदाचार्य आणि योगशिक्षक आहेत.)