शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

आहाराबाबत थोडे शरीराचेही ऐकू या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:27 IST

डॉक्टर, दोन दिवस ताप होता, लंघन केल्यावर बरे वाटले. ताप कमी आहे, फक्त भाताजी पेज घेतलीय, आता बरे वाटतेय. ...

डॉक्टर, दोन दिवस ताप होता, लंघन केल्यावर बरे वाटले. ताप कमी आहे, फक्त भाताजी पेज घेतलीय, आता बरे वाटतेय. आज थोडा वरणभात खाऊ का?, थोडे सूप घेतले तर चालेल का?

डॉक्टर आणि रुग्णांतील हे संभाषण नेहमीच ऐकायला मिळते. कोरोनामध्ये ताप हे प्राथमिक लक्षण आहे. यामध्ये पचनशक्ती खूपच कमी होते. काही खावेसे वाटत नाही. अशक्तपणा वाढतो. औषधे पचविण्याची ताकद राहत नाही. अशा रुग्णांना आयुर्वेद लंघनाचा सल्ला देते. ते फायदेशीरही ठरते. शरीरातील अवयवांना, पचनसंस्थेला विश्रांती मिळते. बिघाड दुरुस्तीसाठी शरीराला वेळ मिळतो.

आयुर्वेदाने हजारो वर्षांपासून हा आहार सिद्ध केलेला आहे; पण कोरोना काळात अंडी, मटण, चपाती यावर जोर दिसत आहे. कोरोनाग्रस्तांना प्रथिनांच्या नावाखाली दिवसातून तीन-तीनदा अंडी दिली जाताहेत. यामुळे शुद्ध शाकाहारी रुग्ण संभ्रमात आहेत, धर्मसंकटात सापडले आहेत. जीव वाचवायचा की धर्म, असे संकट आहे.

कोरोनामध्ये ताप थोडासा कमी झालेल्या रुग्णांना हलका व पातळ आहार फायदेशीर ठरतो. भाताची पेज, मुगाचे कढण थोडेथोडे घ्यावे. ते पचल्यास तूप, वरणभात, मुगाच्या डाळीची खिचडी, भुकेनुसार वरईचा भात किंवा ज्वारीची भाकरी द्यावी. या आहारात वेगळे काहीच नाही. वर्षानुवर्षे भारतीयांनी त्याचा अंगीकार केलाय. बहुतेक कोरोनाग्रस्तांना भूक नसते. मळमळ, उलटी होते. औषधांमुळे पित्त वाढते. पोट साफ होत नाही. अशावेळी पचायला जड सामिष आहार कितपत समर्थनीय आहे? अशक्तपणामुळे पोट खपाटीला लागलेल्या रुग्णाला या पैलवानी आहाराची गरज अजिबात नाही. तापामध्ये कडकडून भूक लागेपर्यंत पोट रिकामे ठेवण्याचा हमखास फायदा होतो. कोमट पाणी पिण्याचाही फायदा होतो. शरीरातील बिघाड दुरुस्तीसाठी वेळही द्यायला हवा. औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले पेजेसारखे पातळ पदार्थ अशा आजारांत कामी येतात. गूळवेल, पटोल, काडेचिराईत ही कडू रसाची औषधे प्रभावी ठरतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले शरीर वेळोवेळी सिग्नल देत असते. चक्र कुठेतरी बिघडत असल्याचे सांगत असते. अशावेळी डॉॅक्टरांकडून औषधे नक्कीच घ्या, पण आहाराच्या बाबतीत शरीराच्या डॉक्टरचेही ऐकायला शिकू या!

(लेखक सांगलीतील आयुर्वेदाचार्य आणि योगशिक्षक आहेत.)