शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

आहाराबाबत थोडे शरीराचेही ऐकू या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:27 IST

डॉक्टर, दोन दिवस ताप होता, लंघन केल्यावर बरे वाटले. ताप कमी आहे, फक्त भाताजी पेज घेतलीय, आता बरे वाटतेय. ...

डॉक्टर, दोन दिवस ताप होता, लंघन केल्यावर बरे वाटले. ताप कमी आहे, फक्त भाताजी पेज घेतलीय, आता बरे वाटतेय. आज थोडा वरणभात खाऊ का?, थोडे सूप घेतले तर चालेल का?

डॉक्टर आणि रुग्णांतील हे संभाषण नेहमीच ऐकायला मिळते. कोरोनामध्ये ताप हे प्राथमिक लक्षण आहे. यामध्ये पचनशक्ती खूपच कमी होते. काही खावेसे वाटत नाही. अशक्तपणा वाढतो. औषधे पचविण्याची ताकद राहत नाही. अशा रुग्णांना आयुर्वेद लंघनाचा सल्ला देते. ते फायदेशीरही ठरते. शरीरातील अवयवांना, पचनसंस्थेला विश्रांती मिळते. बिघाड दुरुस्तीसाठी शरीराला वेळ मिळतो.

आयुर्वेदाने हजारो वर्षांपासून हा आहार सिद्ध केलेला आहे; पण कोरोना काळात अंडी, मटण, चपाती यावर जोर दिसत आहे. कोरोनाग्रस्तांना प्रथिनांच्या नावाखाली दिवसातून तीन-तीनदा अंडी दिली जाताहेत. यामुळे शुद्ध शाकाहारी रुग्ण संभ्रमात आहेत, धर्मसंकटात सापडले आहेत. जीव वाचवायचा की धर्म, असे संकट आहे.

कोरोनामध्ये ताप थोडासा कमी झालेल्या रुग्णांना हलका व पातळ आहार फायदेशीर ठरतो. भाताची पेज, मुगाचे कढण थोडेथोडे घ्यावे. ते पचल्यास तूप, वरणभात, मुगाच्या डाळीची खिचडी, भुकेनुसार वरईचा भात किंवा ज्वारीची भाकरी द्यावी. या आहारात वेगळे काहीच नाही. वर्षानुवर्षे भारतीयांनी त्याचा अंगीकार केलाय. बहुतेक कोरोनाग्रस्तांना भूक नसते. मळमळ, उलटी होते. औषधांमुळे पित्त वाढते. पोट साफ होत नाही. अशावेळी पचायला जड सामिष आहार कितपत समर्थनीय आहे? अशक्तपणामुळे पोट खपाटीला लागलेल्या रुग्णाला या पैलवानी आहाराची गरज अजिबात नाही. तापामध्ये कडकडून भूक लागेपर्यंत पोट रिकामे ठेवण्याचा हमखास फायदा होतो. कोमट पाणी पिण्याचाही फायदा होतो. शरीरातील बिघाड दुरुस्तीसाठी वेळही द्यायला हवा. औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले पेजेसारखे पातळ पदार्थ अशा आजारांत कामी येतात. गूळवेल, पटोल, काडेचिराईत ही कडू रसाची औषधे प्रभावी ठरतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले शरीर वेळोवेळी सिग्नल देत असते. चक्र कुठेतरी बिघडत असल्याचे सांगत असते. अशावेळी डॉॅक्टरांकडून औषधे नक्कीच घ्या, पण आहाराच्या बाबतीत शरीराच्या डॉक्टरचेही ऐकायला शिकू या!

(लेखक सांगलीतील आयुर्वेदाचार्य आणि योगशिक्षक आहेत.)