शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एकरकमी ऊस बिलासाठी संघर्ष करू

By admin | Updated: October 6, 2015 00:33 IST

राजू शेट्टी : साखरसम्राटांना एफआरपीचे तुकडे पाडून टप्पे ठरविण्याचा अधिकार नाही

कामेरी : साखरसम्राटांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत ऐनवेळच्या विषयात ‘एफआरपी’ तीन टप्प्यात देण्याचा ठराव मंजूर केला असला तरी, तो त्यांचा अधिकार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना एफआरपीचे तुकडे करु देणार नाही. ऊस उत्पादकांना एकरकमी बिल मिळण्यासाठी प्रसंगी संघर्ष करू, असे प्रतिपादन खा. राजू शेट्टी यांनी केले.कामेरी (ता. वाळवा) येथे हरिजन पाणंद रस्त्याचे उद्घाटन खा. शेट्टी यांच्याहस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक अध्यक्षस्थानी होते. यावेळी आ. नाईक यांच्याहस्ते मोंडे पाणंद रस्ता कामाचे भूमिपूजन घेण्यात आले.खा. शेट्टी म्हणाले, गत हंगामात २७00 रुपयांवर तडजोड करुन ऊस दर आंदोलन मागे घेतले, म्हणून माझा निषेध करणाऱ्यांनी २२00 पेक्षा जास्त दर का दिला नाही? शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात वारणा वगळता सर्वांनी एफआरपीप्रमाणे दर दिला. मग सांगली जिल्ह्यात असे का झाले नाही? याचे उत्तर प्रथम सभासदांना द्या, मग शेतकरी संघटनेची मापे काढा. एफआरपी ठरविण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे, राज्य शासन अथवा कारखानदारांना नाही. म्हणून एफआरपीचे तुकडे करुन पैसे हातात देण्याचा कट आम्ही उधळून लावू. यासाठी १६ आॅक्टोबरला कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.आ. शिवाजीराव नाईक यांच्या स्थानिक रस्ते विकास कार्यक़्रमातून १२ लाख व खा. शेट्टी यांच्या फंडातून ७ लाख रुपये हरिजन पाणंद रस्त्यासाठी मंजूर करण्यात आले होते. यावेळी दि. बा. पाटील, सिनेअभिनेते विलास रकटे, ग्रा.पं. सदस्य मनोज पाटील, राजेंद्र पाटील, उत्तम पाटील, सर्कल जे. एम. गातपाटील, बंडाकाका पाटील, ए. टी. ठोंबरे, सज्जनराव पाटील, एस. आर. पाटील, संताजी पाटील, हेमंत पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यशवंत ग्लुकोजचे संचालक शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले, शेतकरी संघटनेचे खाशेराव निंबाळकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)पक्षी अभयारण्यासाठी प्रयत्न करणारयावेळी आमदार नाईक यांनी कामेरी येथे राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या तलावाची पाहणी केली व त्याठिकाणी सर्व सोयींनीयुक्त असा बोटिंग क्लब व बगीचा करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रीय महामार्गालगतच्या तलावातील गाळ काढून तलावाचे सुशोभिकरण केले जाणार आहे. यामुळे परिसरात एक नवीन व देखणे पर्यटनस्थळ निंर्माण होऊन अर्थकारणालाही गती मिळेल. रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्याठिकाणी पर्यटन केंद्र करुन बोटिंग क्लब तयार तयार करण्यात येणार आहे. तलावाचेही सुशोभिकरण करण्यात येणार आहे पक्षी अभयारण्यामुळे पक्षीप्रेमींही या भागाकडे आकर्षित होतील, तसेच त्यासमोरील चार एकर जागेत बगीचा व पक्षी अभयारण्य निर्माण करण्यासाठी राज्य, केंद्र शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती आमदार नाईक यांनी यावेळी दिली. एकूणच हा प्रकल्प तालुक्यासाठी लाभदायक ठरेल, असे ते म्हणाले.