शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

एकरकमी ऊस बिलासाठी संघर्ष करू

By admin | Updated: October 6, 2015 00:33 IST

राजू शेट्टी : साखरसम्राटांना एफआरपीचे तुकडे पाडून टप्पे ठरविण्याचा अधिकार नाही

कामेरी : साखरसम्राटांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत ऐनवेळच्या विषयात ‘एफआरपी’ तीन टप्प्यात देण्याचा ठराव मंजूर केला असला तरी, तो त्यांचा अधिकार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना एफआरपीचे तुकडे करु देणार नाही. ऊस उत्पादकांना एकरकमी बिल मिळण्यासाठी प्रसंगी संघर्ष करू, असे प्रतिपादन खा. राजू शेट्टी यांनी केले.कामेरी (ता. वाळवा) येथे हरिजन पाणंद रस्त्याचे उद्घाटन खा. शेट्टी यांच्याहस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक अध्यक्षस्थानी होते. यावेळी आ. नाईक यांच्याहस्ते मोंडे पाणंद रस्ता कामाचे भूमिपूजन घेण्यात आले.खा. शेट्टी म्हणाले, गत हंगामात २७00 रुपयांवर तडजोड करुन ऊस दर आंदोलन मागे घेतले, म्हणून माझा निषेध करणाऱ्यांनी २२00 पेक्षा जास्त दर का दिला नाही? शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात वारणा वगळता सर्वांनी एफआरपीप्रमाणे दर दिला. मग सांगली जिल्ह्यात असे का झाले नाही? याचे उत्तर प्रथम सभासदांना द्या, मग शेतकरी संघटनेची मापे काढा. एफआरपी ठरविण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे, राज्य शासन अथवा कारखानदारांना नाही. म्हणून एफआरपीचे तुकडे करुन पैसे हातात देण्याचा कट आम्ही उधळून लावू. यासाठी १६ आॅक्टोबरला कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.आ. शिवाजीराव नाईक यांच्या स्थानिक रस्ते विकास कार्यक़्रमातून १२ लाख व खा. शेट्टी यांच्या फंडातून ७ लाख रुपये हरिजन पाणंद रस्त्यासाठी मंजूर करण्यात आले होते. यावेळी दि. बा. पाटील, सिनेअभिनेते विलास रकटे, ग्रा.पं. सदस्य मनोज पाटील, राजेंद्र पाटील, उत्तम पाटील, सर्कल जे. एम. गातपाटील, बंडाकाका पाटील, ए. टी. ठोंबरे, सज्जनराव पाटील, एस. आर. पाटील, संताजी पाटील, हेमंत पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यशवंत ग्लुकोजचे संचालक शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले, शेतकरी संघटनेचे खाशेराव निंबाळकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)पक्षी अभयारण्यासाठी प्रयत्न करणारयावेळी आमदार नाईक यांनी कामेरी येथे राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या तलावाची पाहणी केली व त्याठिकाणी सर्व सोयींनीयुक्त असा बोटिंग क्लब व बगीचा करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रीय महामार्गालगतच्या तलावातील गाळ काढून तलावाचे सुशोभिकरण केले जाणार आहे. यामुळे परिसरात एक नवीन व देखणे पर्यटनस्थळ निंर्माण होऊन अर्थकारणालाही गती मिळेल. रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्याठिकाणी पर्यटन केंद्र करुन बोटिंग क्लब तयार तयार करण्यात येणार आहे. तलावाचेही सुशोभिकरण करण्यात येणार आहे पक्षी अभयारण्यामुळे पक्षीप्रेमींही या भागाकडे आकर्षित होतील, तसेच त्यासमोरील चार एकर जागेत बगीचा व पक्षी अभयारण्य निर्माण करण्यासाठी राज्य, केंद्र शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती आमदार नाईक यांनी यावेळी दिली. एकूणच हा प्रकल्प तालुक्यासाठी लाभदायक ठरेल, असे ते म्हणाले.