शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानाने पानमळे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:27 IST

नरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून ...

नरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा वाढता राहिल्याने पानवेलींचे शेंडे व पाने काळी पडून करपू लागली आहेत. याशिवाय पानांच्या फुटव्यांवरही परिणाम झाला आहे. किमान २१ दिवसांनी येणारा पानवेलीचा खुडा महिन्यावर जाऊन पोहोचला आहे.

पानवेल ही एक संवेदनशील वनस्पती असून, पानांवर हवामानातील बदलाचा सतत परिणाम जाणवत असतो.

पावसाळ्यात पाणी जास्त झाल्यास पानगळ होऊन मूळकुजव्या येतो. थंडीत पानांचा फुटवा बंद पडतो. उन्हाळ्यात मात्र उन्हाचा झळांमुळे पानवेल करपून पाने काळी पडतात.

साधारणपणे पानवेली २५ ते ३० अंशांपर्यंत तग धरून राहतात. मात्र सध्या स्थिती पाहता उन्हाचा पारा ४१ अंशांपर्यंत जाऊ लागल्याने पाने करपू लागली आहेत. यामुळे हजारो रुपयांचे नुकसान पान उत्पादकांना सोसावे लागत आहे.

दरम्यान, करपलेल्या खाऊच्या पानांना पानबाजारपेठेत कवडीमोल किमतीला मागणी होत आहे. उन्हाचा पारा असाच वाढत राहिला तर पानवेलीची बुंध्यालगतची गोलाकार कडी वाळून पानवेल कोमेजणार आहे.

सांगली जिल्ह्यात २२४ हेक्टर क्षेत्रावर पानवेलींची लागवड केली आहे. यापैकी मिरज तालुक्यातील १९८ हेक्टर क्षेत्रावर पानवेलींची लागवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नरवाडला ८० हेक्टर क्षेत्रावर पानवेलींची लागवड झाली आहे. या सर्व क्षेत्रापैकी उन्हांमुळे किती क्षेत्र तग धरून राहते हे आता काळच ठरविणार आहे.

याबाबत पान उत्पादक शेतकरी मधुकर जाधव यांना विचारले असता, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढतच चालल्याने पानमळ्यांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

चाैकट

हीे काळजी घ्या

उन्हाळ्यात पानमळ्याला पाणी शक्यतो

वाफ्याने चार दिवसांच्या अंतराने द्यावे. पानमळ्याला उन्हाच्या झळांपासून

संरक्षण मिळण्यासाठी शेडनेटच्या तटबंदी ऐवजी उसाचा पाला वापरावा. उन्हाळ्यात रसायनांचा वापर अजिबात करू नये. पानवेलींचे संतुलित तापमान ठेवण्यासाठी किमान उन्हाळ्यापुरते तुषार सिंचनाचा वापर करावा, अशी माहिती मिरज कृषी विभागाचे कृषी सहायक राजू रजपूत यांनी दिली.